प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हय़ात कोरोना लसीकरणाचा थोडासा टक्का वाढला आहे. रत्नागिरी तालुका वगळता इतर कोरोना लसीकरण सेंटरला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी पार पडलेल्या लसीकरणाला जिल्हय़ातून 67 टक्के प्रतिसाद मिळाला. गुहागरमध्ये तब्बल 92 टक्के लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून देण्यात आली.
जिल्हय़ात रत्नागिरी, दापोली, राजापूर, गुहागर आणि कामथे येथे लसीकरण सेंटर आहेत. यामध्ये रत्नागिरी तालुक्यातच सर्वात कमी लसीकरण झाले आहे. अद्यापही 40 टक्के कर्मचाऱयांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळत नाही आहे. उर्वरित तालुक्यात बऱयापैकी प्रतिसाद मिळत असल्याची माहिती जिल्हा शासकीय रूग्णालयाने दिली. दापोलीत सुरूवातीला हा प्रतिसाद 50 ते 52 टक्के होता. आता हा टक्का वाढला असून शनिवारी 67 टक्के लसीकरण पार पडले. जिल्हय़ात 16 हजार 330 कोविड लस उपलब्ध झाली आहे. पहिल्या टप्प्यात 1500 कर्मचाऱयांना कोरोना लस देण्यात येणार आहे. याची नियोजनबध्द यादी तयार करण्यात आली आहे. आतापर्यंत दिवसाला 200 ते 300 कर्मचाऱयांना दिवसाला लस देण्यात येते. मुळात दिवसाला 500 कर्मचाऱयांना लस देण्याचे उद्दीष्ट आहे. शनिवारी 336 कर्मचाऱयांनी लस घेतली. आतापर्यंत एकूण जिल्हय़ात 1 हजार 420 कर्मचाऱयांना लस देण्यात आली आहे. हा प्रतिसाद आणखीन वाढणे आवश्यक असल्याने आम्ही वारंवार समूपदेशन करत आहोत. मुळात रत्नागिरी तालुका आणि दापोलीतून अत्यल्प प्रतिसाद आहे. 40 टक्के आरोग्य कर्मचाऱयांची लसीकरणाबाबत उदासीनता आहे. त्यामुळे दररोज कर्मचाऱयांचे समूपदेशन करण्याचे काम सुरू असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.