कृषी खात्याकडून सर्व्हेचे काम पूर्ण, भरपाई तुटपुंजी : अवकाळी पावसामुळे भातपिकाला मोठा फटका, रब्बी हंगाम लांबणीवर
प्रतिनिधी /बेळगाव
मागील पंधरा दिवसांत झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्य़ातील भातपिकाला मोठा फटका बसला आहे. जिल्हय़ातील हजारो हेक्टरमधील भातपीक अडचणीत आले. जिल्ह्य़ातील 26 हजार 807 हेक्टरमधील भातपिकाचे नुकसान झाले आहे. कृषी खाते आणि बागायत खात्याने केलेल्या नुकसानग्रस्त शेती सर्व्हेक्षणावरून ही आकडेवारी उपलब्ध झाली आहे.
अवकाळी पावसामुळे भातपिकाबरोबर सुक्या चाऱयाचेदेखील नुकसान झाल्याने जिल्हय़ात चारा समस्या गंभीर बनण्याची चिन्हे आहेत. अवकाळी पाऊस अतिप्रमाणात झाल्याने शिवारात पाणी साचून भातपिकाला फटका बसला आहे. तसेच अद्याप काही शिवारातून पाणी असल्याने रब्बी हंगाम देखील लांबणीवर पडला आहे. हातातोंडाशी आलेले भातपीक नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झाला आहे. कृषी खात्याने नुकसानग्रस्त शेतीच्या सर्व्हेचे काम पूर्ण केले आहे. नुकसान झालेल्या शेतीची माहिती अपलोड करून पुढे पाठविली जाणार आहे. जिल्हय़ात मोठय़ा प्रमाणात भाताची लागवड केली जाते. मात्र अतिपावसामुळे आलेले भातपीक जमीनदोस्त झाल्याने बळीराजा संकटात सापडला आहे.
शासनाकडून तुटपुंजी मदत जाहीर
शासनाने अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीला केवळ तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. गुंठय़ाला 68 रुपये तर एकर जमीन क्षेत्राला 6800 रुपये मदत जाहीर केली आहे. ही भरपाई केवळ शेतकऱयांच्या तोंडाला पाने पुसण्याचे प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.
खरीपबरोबर रब्बी हंगामातील पिके धोक्यात
अवकाळी पावसामुळे खरीप हंगामातील भातपिकाला फटका बसला आहे. त्यामुळे भात कापणी व इतर कामे लांबणीवर पडली आहेत. खरीप हंगामाबरोबर रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीलादेखील याचा फटका बसला आहे.
भरपाई लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील
जिल्हय़ात सर्वांधिक भातपिकालाच फटका बसला आहे. खात्याकडून सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे. शेतकऱयांना लवकर नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहणार आहेत. काही तालुक्मयांमध्ये अवकाळी पाऊस अधिक झाल्याने भातपिकाचे नुकसान झाले आहे.
– एच. डी. कोळेकर (उप कृषी निर्देशक)
तालुके | नुकसानग्रस्त क्षेत्र हेक्टरमध्ये |
बैलहोंगल | 4665 |
बेळगाव | 1382 |
खानापूर | 3632 |
कित्तूर | 180 |
रामदुर्ग | 3600 |
सौंदत्ती | 1761 |
एकूण | 26807 |