ऑनलाईन टीम/तरुण भारत
महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील जैतापूरमधील जागेला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. येथे अणुऊर्जेच्या सहा अणुभट्ट्या उभारण्यास परवानगी मिळालीआहे. लवकरच या प्रकल्पाचे काम जलद गतीने मार्गी लागण्याची शक्यता आहे. ही माहिती केंद्रीय अणुऊर्जा राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत दिली.
दरम्यान, प्रत्येकी 1, 650 मेगावॅट क्षमतेच्या सहा अणुभट्ट्या फ्रान्सच्या तांत्रिक सहकार्याने उभारल्या जाणार आहेत. एकूण 9,900 मेगावॅट क्षमतेसह देशातील सर्वात मोठे अणुऊर्जा निर्मितीचे ठिकाण म्हणून जैतापूर असणार आहे. दरम्यान, सध्या यासंबंधी फ्रान्ससोबत प्रकल्प प्रस्तावावर तांत्रिक चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितले आहे.