ऑनलाईन टीम / रांची :
झारखंड सरकारने अनलॉक 3 ची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी केली आहे. यामध्ये काही निर्बंधात सूट देण्यात आली आहे. सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली आपदा प्रबंधन प्राधिकरणची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनलॉक 3 चा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना सोरेन म्हणाले की, या अंतर्गत सर्व दुकाने आता सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासोबतच शॉपिंग मॉल आणि डिपार्टमेंटल स्टोर सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी शनिवारी दुपारी चार वाजल्यापासून ते सोमवार सकाळपर्यंत सर्व काही बंद असणार आहे.
काय असणार सुरू आणि काय बंद :
- सर्व जिल्ह्यात दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत.
सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये 50 % क्षमतेनुसार दुपारी चार वाजेपर्यंत सुरू असतील.
- शनिवारी सायंकाळी चार वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत सर्व दुकाने (फळे, भाजी, किराणा) बंद राहतील. आरोग्य सेवेसंबधित प्रतिष्ठान आणि दूध डेअरी सुरू असणार आहे.
- अन्य निर्बंध पाहिल्याप्रमाणे असणार आहेत.
- थिएटर, क्लब, बार, कार्यालये, मल्टिप्लेक्स बंद असतील.
- सर्व शिक्षण संस्था बंद असतील. आंगांवडी केंद्रे बंद असतील. मात्र, लाभार्थ्यांना त्याच्या घरी खाद्य सामुग्री पोहचवली जाईल.
- पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई असेल. धार्मिक स्थळे अजूनही बंदच असतील.
- विवाह समारंभात केवळ 11 जणांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे.
- काही अपवाद वगळता दुसऱ्या राज्यातून झारखंडमध्ये येणाऱ्यांना सात दिवस होम क्वारंटाइन राहणे बंधनकारक असेल.
- सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.
- सरकारद्वारे देण्यात आलेल्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.