जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची व्यथा
प्रतिनिधी/ सातारा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. सगळीकडे संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे हातावरील पोट आसणाऱयांचा हाताचा रोजगार ही बंद झाला आहे. रोजगार बंद असल्याने घरातील चूल बंद असल्याने रिकाम्या पोटी शिकायला मन तयार होत नाही. जिह्यातील सातारा जिल्हा परिषदेच्या सुमारे 2772 शाळा आहेत. या शाळेतील बहुतांशी सर्वच विद्यार्थ्यांची कौटुंबिक अवस्था बिकट झाल्याने शिक्षण नको पहिली खायला भाकर द्या, अशीच आर्जव होताना दिसत आहे. दरम्यान, सातारा शहरातील काही भागात तर हातावरचे पोट असणायासोबत आता मध्यमवर्गीय नागरिकांचे हाल होत आहेत.
गेल्या 23 मार्चपासून कोरोनाच्या कारणास्तव सर्व व्यवहार बंद आहेत. शाळा, कॉलेज, बाजारपेठ यासह ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था, एसटी वाहतूक असे सगळे बंद आहे. कंपन्या बंद असल्याने ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांच्या घरावर उपासमारीची वेळ आली आहे. रिकामी भांडी अन भुकेले पोट बाहेर जावे तर पोलिसांची काठी किंवा गुन्हा दाखल होतो. त्यामुळे घरातच विझलेल्या चुलीकडे कच्च्याबच्याकडे पहात काहीजण दिवस ढकलत आहेत. कोरोनामुळे ही वेळ आली आहे. अशा परिस्थितीतही ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे, त्यांचीच मुले चांगल्या शाळेत आहेत. त्यांनाच शिक्षण सध्या झुम ऑप, मोबाईल आणि इंटरनेटद्वारे सुरू आहे.
मात्र, ज्यांच्या घरात अठरा विश्व दारिद्रय आहे. दररोज आई, बापाने काम केले तरच लहानग्या पोरांना खायला मिळते, अशाचे सद्या बेहाल सुरू आहेत. जिह्यात अशा गरिबांच्या मुलांना शिक्षण देणाऱया जिल्हा परिषदेच्या सुमारे 2772 शाळा आहेत. त्यात हजारो मुले शिक्षण घेत आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केला खरा पण त्या लॉकडाऊनमुळे कोरोनाला रोखण्यात यश आले असले तरीही पोटाची भूक गरिबांना थांबवता येत नाही. काहींच्याकडे मोबाईल नाहीत. काहींच्याकडे मोबाईल असून त्याला रिचार्ज मारायला पैसे नाहीत. सद्या लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण काही ठिकाणी झूम ऍपवर देण्याची जी संकल्पना सुरू आहे. ती संकल्पना ज्यांची परिस्थिती सक्षम आहे त्यांच्यासाठी असल्याचे वाटते. गरिब विद्यार्थ्यांना झूम ऍपचे शिक्षण देण्याऐवजी पोटाला भाकर द्या, असा सूर उमटू लागला आहे.