झोप होते प्रभावित, एकाकीपणाची जाणीव
टाळाटाळ करण्याच्या सवयीमुळे लोकांचे नातेसंबंध बिघडत आहेत. तसेच झोपही प्रभावित होत आहे. अशाप्रकारची सवय असणाऱया लोकांना एकाकीपणा जाणवत असून नैराश्याच्या समस्येलाही तोंड देत आहेत. स्टॉकहोम समवेत अन्य 8 विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे.
संशोधनानुसार विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांकडे स्वातंत्र्य भरपूर आहे, परंतु टाळाटाळ करण्याच्या सवयीमुळे 50 टक्के विद्यार्थ्यांचे शिक्षण प्रभावित होते. ही सवय अनेकदा एका चांगल्या माणसाच्या व्यक्तिमत्त्व आणि त्याच्या जीवनातील यशाला संपुष्टात आणत आहे.
टाळाटाळ करण्याच्या सवयीमुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रभावित होत आहे. टाळाटाळ करणाऱया लोकांमध्ये उच्चस्तराचा तणाव असण्याची जोखीम अधिक असते, यामुळे आत्मविश्वास घटत असतो असे एका अन्य संशोधनातून समोर आले आहे.
जामा नेटवर्क ओपनमध्ये प्रकाशित या अध्ययनासाठी 3,525 विद्यार्थ्यांपैकी 2,587 जणांना 9 महिन्न्यांपर्यत प्रश्नांची उत्तरे विचारण्यात आली. याची उत्तरे देतेवेळी अनेक आरोग्य संबंधी तपासण्या देखील करण्यात आल्या. यादरम्यान टाळाटाळ करणाऱया विद्यार्थ्यांच्या खांद्यांमध्ये अन् हातांमध्ये वेदना, झोपेची खराब गुणवत्ता, अधिक एकाकीपणा आणि अधिक वित्तीय समस्यांची शक्यता राहिली आहे. परंतु या समस्येवर चांगल्या सवयी लावून घेत मातही करता येते. दिनचर्येत छोटे बदल केले तरीही मोठा प्रभाव पडू शकतो. काही काळासाठी मोबाइल बंद करून स्वतःला वेळ देणे यात सामील आहे. स्वतःसाठी अधिक वेळ काढत आपण् टाळाटाळ का करत आहोत यामागील कारण शोधले जावे असे संशोधकांनी म्हटले आहे.
काही प्रमाणात प्रकृती बिघडल्यावर आम्ही डॉक्टरांकडून सल्ला घेण्यास मोठी टाळाटाळ करत असतो, यातुन गंभीर आरोग्य समस्या उद्भवण्याचा धोका असतो. अशाचप्रकारे तणाव, हानिकारक जीवनशैली आणि आरोग्य समस्यांविषयी सल्ला घेण्यास विलंब करण्याची सवय असते.