प्रतिनिधी/ रत्नागिरी
जगभर थैमान घालणाऱया कोरोनाने मानवी जीवनावरही मोठे परिणाम घडवल़े अगदी वैवाहिक जीवनापर्यंत अनेक गोष्टी बदलून गेल्या असून भविष्यात ते आणखी बदलतील, असे तज्ञांचे म्हणणे आह़े कोरोना काळात रत्नागिरी जिह्यात वैद्यकिय गर्भपातांचे प्रमाण वाढल्याच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांच्या कालावधीत 1380 गर्भपाताच्या घटनांची नोंद झाली आहे.
रत्नागिरी जिह्यात 2019 मध्ये मार्च महिन्यात शासकीय गर्भपात केंद्रात 14 गर्भपात झाले होत़े बिगर शासकीय मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात 435 गर्भपात झाले होत़े दोन्ही मिळून 449 गर्भपात झाल्याचा आकडा नोंदवण्यात आल़ा याच वर्षाच्या एप्रिल महिन्यात तो आकडा 483 वर जाउढन पोहोचला. त्यात सरकारी केंद्रात 13 तर बिगर सरकारी केंद्रात 470 एवढा आकडा दर्शवण्यात आल़ा गतवर्षीच्या म्हणणे 2019 च्या मे महिन्यात शासकीय गर्भपात पेंद्रात 18 गर्भपात झाले तर बिगर शासकीय मान्यताप्राप्त गर्भपात केंद्रात 417 एवढे गर्भपात झाल़े पूर्ण महिन्यात दोन्ही मिळून 435 एवढी गर्भपातांची संख्या झाल़ी यावर्षीच्या मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यांमध्ये 1367 एवढे गर्भपात झाल्याची नोंद शासनाच्या आरोग्य विभागाने ठेवली आह़े
मार्च 2020 मध्ये शासकीय गर्भपात केंद्रात 28 तर बिगर शासकीय गर्भपात पेंद्रात 363 एवढी गर्भपातांची नोंद झाल़ी दोन्ही मिळून 391 एवढे गर्भपात झाल्याचे नोंदवले गेल़े याच वर्षीच्या एप्रिल महिन्यात शासकीय केंद्रात 16 तर बिगर शासकीय पेंद्रात 496 असे मिळून 512 गर्भपात जिह्यात झाल्याचे आरोग्य यंत्रणेचे म्हणणे आह़े नुकत्याच संपलेल्या मे महिन्यात शासकीय केंद्रात 12 तर बिगर शासकीय केंद्रामध्ये 465 एवढे गर्भपात नोंदवले गेल़े एकूण 477 एवढे गर्भपात या महिन्यात झाल्याचे आरोग्य यंत्रणेने नोंदवून घेतले आह़े 1380 एवढे गर्भपात 2020च्या मार्च, एप्रिल व मे अशा तीन महिन्यात मिळून झाल्याचे आरोग्य यंत्रणेने म्हटले आह़े
अनेक खासगी वैद्यक व्यवसायिक आपापल्या रूग्णालयात गर्भपाताची सुविधा गरजू महिलांना उपलब्ध करून देतात़ हे व्यावसायिक आरोग्य खात्याकडे आपल्या गर्भपात पेंद्राची यथायोग्य नोंदणी करतात आणि कामकाज करतात़ या केंद्रांना बिगर शासकीय गर्भपात केंद्र असे म्हणतात़ गरजू महिला त्यांच्या सोयीप्रमाणे शासकीय पेंवा खासगी पेंद्रात जाऊन सुविधा घेत असतात़
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्चच्या अखेरीला टाळेबंदी जारी झाल़ी त्यानंतर पुढचे काही दिवस लोकांनी आपापल्या घरातच थांबाव़े बाहेर पडू नये, असे संदेश राजकीय नेते देत होत़े लोकांच्या घरात थांबण्याचा या आकडेवारीवर नेमका काय परिणाम होणार, अशी उत्सुकता सामाजिक अभ्यासकांना लागून राहिली होत़ी 2019 मध्ये मार्च, एप्रिल व मे महिन्यात म्हणजे टाळेबंदी नसताना रत्नागिरी जिह्यात 1367 एवढे गर्भपात झाले तर 2020 मध्ये याच तीन महिन्यांमध्ये मिळून 1380 एवढे गर्भपात झाल़े
टाळेबंदी काळात गर्भपाताची आकडेवारी वाढल्याचे दिसून आले आह़े ही वाढ खूप मोठी नसली तरी 13 एवढय़ा संख्येने ती वाढली आह़े जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते की, विविध देशात टाळेबंदीमुळे अनेक इच्छुक महिलांना गर्भपात करून घेता आलेला नाह़ी त्यामुळे या महिला अडचणींना तोंड देत आहेत़ रत्नागिरी जिह्यात मात्र तसे काही घडून न येता इच्छुक महिलांना गर्भपात सुविधा उपलब्ध झाल्याचे लक्षात आले आह़े