प्रतिनिधी/ सातारा
सध्या दीपावली सणानिमित्त बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. या गर्दीमुळे वाहतुक कोंडीच्या समस्या मोठय़ा प्रमाणात उदभवत होत्या याचीच दखल घेत वाहतुक विभागाने विविध ठिकाणी बॅरिगेटस् लावुन वाहतुक, गर्दी नियंत्रणात अणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. पण अनेक सातारकरांनी तर बॅरीगेटस लावण्यात आले म्हणून काय झाले म्हणत पर्यायी मार्गाचा शोध लावत पुन्हा वाहतुक कोंडी जैसी थे निर्माण होत आहे. त्यामुळे ट्राफिक जामची सातारी जुगाड कायम असल्याची दिसत आहे.
सध्या मोतीचौक मार्ग, खनआळी परिसर, राजवाडा आदी भागात मोठय़ा प्रमाणात दीवाली निमित्त खरेदीसाठी गर्दी झाली आहे. त्यातच चार चाकी, व मोठय़ा अवजड वाहनांमुळे तर आणखीनच वाहतुक कोंडी निर्माण होत होती. याची दखल खेत वाहतुक विभागाने कमानी हौद परिसरात, राजवाडा मार्गावर, खनआळी परिसरात बॅरिगेटस् लाऊन अवजड वाहनांना बंदी करण्यात आली आहे. पण अनेक नागरिक कमानी हौदाकडील वरील मार्गावरून जावुन वाघाचीनळी परिसरातील पर्यायी मार्ग शाधुन पुन्हा मुख्य बंदी असलेल्या मुख्य मार्गावर आपली अवजड वाहने घेऊन जात आहेत त्यामुळे वाहतुक कोंडी जैसी थे निर्माण होत आहे. याची सर्वाधिक डोकेदुखी ही ट्राफीक हवालदारांना होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी ही सजगता दाखवुन वाहतुक विभागाने दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.