वृत्तसंस्था / मुंबई
सध्या शाखांमधून व्यवहार करण्याचे टाळत ग्राहक डिजिटल प्लॅटफार्मच्या आधारे व्यवहार करण्याकडे वळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे सदरचा हा बदल लोकांच्या अंगवळणी पडत असल्याचेही भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष रजनीश कुमार यांनी यावेळी सांगितले आहे.
सदरच्या बदलाची माहिती देताना उदाहरणासह स्पष्ट करताना रजनीश कुमार यांनी सांगितले की, जवळपास 100 जणांमधील देवाण घेवाणीतील फक्त सात जण स्टेट बँकेच्या शाखेत प्रत्यक्ष येऊन व्यवहार करत असल्याचे म्हटले आहे. हाच आकडा तीन वर्षाच्या अगोदर व्यवहार करताना 100 पैकी 20 असा आकडा होता.
एटीएम व्यवहारातही घट
ग्राहक आता बँकांच्या शाखेत तर जात नाहीतच शिवाय एटीएमच्या व्यवहारातही मोठी घट झाली असल्याचे समोर आले आहे.