प्रतिनिधी/ रत्नागिरी, लांजा
सोमवारी रात्री नऊ वाजल्यानंतर रत्नागिरी शहराला ढगफुटीसदृश पावसाने अक्षरश: झोडपुन काढले. दोन तास कोसळलेल्या पावसाने शहरात सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली. बाजारपेठ व मुख्य रस्त्यावरील काही भागात मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबले होते. जिह्यात विविध भागात रात्री पावसाने तारांबळ उडवली असून हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस जिह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
गेला आठवडाभर पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या. सोमवारी दिवसा विश्रांती घेतलेल्या पावसाने दुपारपासून पुन्हा जोर धरला. सायंकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत मुसळधार पाऊस कोसळत होता. यामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले. मुख्य बाजारपेठ असलेल्या गोखले नाका, मारुती आळी भागात जवळजवळ गुडघाभर पाणी साचले होते. बाजारपेठेतील काही दुकानातही पाणी शिरल्याने व्यापाऱयांची मोठी धावपळ उडाली.
शहरात नळपाणी योजनेचे काम सुरु असून यासाठी झालेल्या खोदाईमुळे अनेक ठिकाणी पाण्याचा निचरा झाला नाही. शहरातील मारुती मंदिर भागातील के सी जैन नगर समोरील रस्त्यावर पहिल्यांदाच पाणी साचल्याने नदीचे स्वरूप आले होते. या पावसाचा जोर रत्नागिरी शहर व आजूबाजूच्या परिसरात अधिक होता. सकाळी पावसाचा जोर ओसरला. मंगळवारी सकाळपर्यत झालेल्या 24 तासांत जिल्हय़ात 169.10 मिमि इतक्या पर्जन्यमानाची नोंद झाली. त्यात रत्नागिरी 32.30, लांजा 28.10, मंडणगड 20.30, गुहागर 28.70, संगमेश्वर 20.50 मिमि पर्जन्यमान झाले. उर्वरित तालुक्यात पावसाची नुसती भुरभूर सुरू होती. मात्र पुढील चार ते पाच दिवस जिह्याला अतिवृष्टीचा इशारा आहे.
भांबेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस
तालुक्यातील भांबेड येथे ढगफुटीसदृष्य पाऊस पडल्याने मुचकूंदी नदी व लगतच्या वहाळांना पुर येवून पुराचे पाणी भातशेतीत घुसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. रविवारी सायंकाळी ही घटना घडली. रविवारी भांबेड परिसरात तब्बल 112 मिमि पाऊस पडला. पुराचे पाणी लगतच्या भातशेतीत घुसल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
मुसळधारेमुळे भातपिके संकटात या सततच्या पडणाऱया पावसामुळे जिल्हय़ातील हळव्या भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. अनेक भागात भातशेती कापणीलायक बनली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग पावसाने विश्रांती घेण्याची वाट पहात आहे. पण काही दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱया पावसामुळे शेतकऱयांची डोकेदुखी वाढली आहे. सखल भागातील शेतात मोठय़ा प्रमाणात पाणी साचल्याने पिकांचे