प्रतिनिधी/आजरा
‘तरुण भारत’च्या आजरा कार्यालयाचा वर्धापनदिन गुरुवार दि. 30 रोजी साजरा होत आहे. यानिमित्त सायंकाळी 5 ते 8 या वेळेपर्यंत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले ले आहे. या स्नेहमेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन ‘तरुण भारत’चे समूह प्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर, कार्यकारी संचालक प्रसाद ठाकुर यांनी केले आहे.
गेल्या 36 वर्षांहून अधिकाळ ‘तरुण भारत’ आजरा तालुक्याचे प्रश्न मांडत विकासाला चालना देत आहे. वाचकांच्या मनात ‘तरुण भारत’ने वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजरा कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त प्रत्येक वर्षी वेगळय़ा विषयाची संग्रही ठेवण्यासारखी पुरवणी दिली आहे. गुरूवारी साजरा होत असलेल्या वर्धापनदिनाच्या निमित्त ग्रामविकास या पुरवणीच्या माध्यमातून आजरा तालुक्याने गेल्या काही दशकात साधलेल्या प्रगतीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे.
धरणग्रस्तांचे प्रश्न असो किंवा शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी असो यामध्ये ‘तरुण भारत’ची भूमिका नेहमीच विधायक राहिली. त्यामुळेच हा परिसर ‘तरुण भारत’ प्रभावक्षेत्र बनला आहे. म्हणूनच या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आजरा शेतकरी संघाच्या आवारामध्ये ‘तरुण भारत’ कार्यालयासमोर स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी अगत्याने उपस्थित रहावे, असे आवाहन ‘तरुण भारत’ परिवारातर्फे करण्यात येत आहे.