ऑनलाईन टीम / नवी मुंबई
जगभरातील नैसर्गिक बदलांच्या अनिष्ट परिणामामूळे पर्यावरण तज्ज्ञांनी वारंवार चिंता व्यक्त केली आहे. वातावरणातील बदलाने होणारी नैसर्गिक हाणी न थांबवल्यास मानवी जीवन धोक्यात येऊ शकते असे ही तज्ज्ञांनी आपले मते मांडले आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचा पहिला वातावरण कृती आराखडा तयार करण्यात आला असुन या कृती आराखड्याचा शुभारंभ राज्याचे पर्यावरण, पर्यटन आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी वातावरण बदलाचे मुंबईवर होणाऱ्या परिणामांबद्दल सुचक वक्तव्य केले आहे.
वातावरण बदलाचा परिणाम भारतातील समुद्र किनाऱ्यालगत असणाऱ्या अनेक शहरांवर होणार असून त्यापैकी मुंबईला ही याचा धोका असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हा आराखडा भविष्याचे अधिक चांगले नियोजन आणि प्रदुषणाची वाढ रोखत, वातावरणाशी अनुकूलता आणि सक्षमतेची खात्री देतो असे ही ते म्हणाले. हीच योग्य वेळ आहे कृती करण्याची, त्यात दिरंगाई झाली तर पुढील दशकभरात मुंबई शहर राहण्यासाठी अयोग्य ठरेल. मुंबईच्या विकास आराखड्यामूळे शहरातील नैसर्गिक रचनेचे संरक्षण, संवदेनशील समूहाची सक्षमता वाढवणे आणि शहराची समृद्ध वाढ होणे. शक्य होणार आहे. तसेच शहरातील हरितगृह वायूंच्या उत्सर्जनात प्रभावी घट करता येईल.’ असे ते म्हणाले.
डिसेंबर २०२० मध्ये मुंबई सी ४० शहरांच्या जाळ्यामध्ये (सी ४० सिटी नेटवर्क) सहभागी झाले असून शहराचा वातावरण कृती आराखडा २०२१ अखेरीस तयार होईल. सी ४० ची मार्गदर्शक तत्त्वे आणि महत्वाकांक्षी निकषांनानुसार हा आराखडा तयार होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका, वर्ल्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट इंडिया (डब्ल्यूआरआय) यांच्या तांत्रिक सहकार्याने हा आराखडा विकसित करत आहे. डब्ल्यूआरआय हे यामध्ये नॉलेज पार्टनर म्हणून कार्यरत आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आयएस चहल यांनी यावेळी विचारात बदल करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे.“वातावरणीय बदलाच्या ताज्या घडामोडी पाहील्या तर आपल्या विचारात बदल करण्याची गरज आहे. नोंदी आणि माहितीवर देखरेख आणि व्यवस्थापन हे अचूक माहितीवर आधारलेले तातडीचे निर्णय घेण्यास उपयुक्त ठरेल असे ही आयुक्त आयएस चहल यांनी आपले मत व्यक्त केले आहे.