मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गुरुदास सोपटे यांचा 60 वा वाढदिन सोहळा
मोरजी/प्रतिनिधी
सोपटे कुटुंबियांच्या संयुक्त कुटुंब पद्धतीचा अवलंब केल्यास समाजात समस्याच उरणार नाहीत असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी केले.
आमदार दयानंद सोपटे यांचे जे÷ बंधू गुरुदास सोपटे यांच्या 60 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सत्कार सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते भाईडवाडा कोरगाव येथील टोमलीफ गर्दन मद्धे हा कार्यक्रम झाला .यावेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री श्रीपादभाऊ नाईक, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर , भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट-तानवडे ,उपाध्यक्ष दत्ता खोलकर ,भाजपचे पेडणे मतदार संघ उमेदवार प्रवीण आर्लेकर ,माजी कला व संस्कृती मंत्री दयानंद मांदेकर,आमदार दयानंद सोपटे,सत्कार मूर्ती गुरुदास सोपटे,सौ गीता सोपटे,सौ.दीपश्री सोपटे ,सौ शांती शांताराम दाभाळे ,शांताराम दाभाळे, हरमल सरपंच मनोहर केरकर,पार्से सरपंच सौ प्रगती सोपटे , तुये सरपंच सुहास नाईक,हरमलचे जे÷ नागरिक काशीराम नाईक मोरजी उपसरपंच अमित शेटगावकर ,धारगळ सरपंच भूषण नाईक,धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहार धारगळकर ,मधुकर पालयेकर आदी उपस्थित होते
यावेळी मुख्य?मत्री डॉ सावंत म्हणाले घराणेशाहीतून आमदार होणे सोपे असते मात्र एका सामान्य कुटुंबातून पुढे येवून आमदार होणे खूप कठीण असते आमदार सोपटे यांचे जे÷बंधू गुरुदास यांच्या त्यागातून गोव्याला एक चांगला आमदार लाभला आहे भावासाठी त्याग करणारा भाऊ आजच्या जमान्यात विरळाच आहे विभक्त कुटुंब पध्दती मुळे भारतीय संस्कृती धोक्मयात आली आहे अश्यावेळी संयुक्त कुटुंबाचा पुरस्कार करणाऱया सोपटे कुटुंबियांचा आदर्श इतरांनी घ्यायला हवा असे सांगितले.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले ,लहान मुलांच्या आनंदासाठी आपण त्यांचे वाढदिवस साजरे करतो त्याप्रमाणे जे÷ांचे वाढदिवस साजरे करायला हवेत त्यातून जे÷ांचे आशीर्वाद आपल्याला निश्चित मिळतील .एखाद्याच्या मृत्यू नंतर श्राद्ध घालण्यापेक्षा त्यांचे वाढदिवस जिवंतपणी साजरे करा त्यांचा आनंद द्विगुणीत करा समाजात निश्चितच उत्साहाचे वातावरण निर्माण होईल समाजातील समस्या आपोआप दूर होतील असे सांगितले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक म्हणाले आजच्या जमान्यात एखादा भाऊ आपल्या भावासाठी त्याग करताना सापडणे दुर्मिळ आहे आमदार सोपटे यांचे बंधू गुरुदास सोपटे यांनी केलेल्या त्यागाला तोड नाही रामायणातील भरतलक्ष्मणाच्या त्यागाइतकेच त्यांच्या त्यागाला महत्व आहे समाज खर्या अर्थाने सुखी होण्यासाठी अश्या त्यागशील वृत्तीची गरज आहे सोपटे बंधूंचा आदर्श इतरांनी घायला हवा असे सांगितले
उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर म्हणाले आजच्या काळात धनदौलत कुणी पाहत नाही माणसे जोडणाऱया माणसांची गरज आहे एका भावासाठी दुसरा भाऊ सर्वस्वाचा त्याग करतो भाऊ मोठा झालेला पाहताना त्याचा उर भरून येतो याहून बंधू प्रेम काय असू शकते एखाद्या वलयांकित व्यक्तींचे वाढदिवस साजरे करण्यापेक्षा अश्या त्यागी वृत्तीचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर यायला हवा असे सांगितले.
भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे म्हणाले,भाऊ कसा असावा याचे उदाहरण म्हणजे आमदार दयानंद सोपटे यांचे जे÷ बंधू गुरुदास होय स्वतः त्याग करून त्यांनी दयानंदाला घडवले त्यांचा मोठेपणा इतरांनी घ्यायला हवा असा भाग्यवान भाऊ एखाद्याच्याच नशिबी येतो असे सांगून सत्कार मूर्तींचा गौरव केला
याप्रसंगी दयानंद मांदेकर,मधुकर पालयेकर यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
यावेळी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत,केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते शाल ,श्रीफळ ,लामणदिवा देवून गुरुदास सोपटे यांचा सत्कार करण्यात आला सौ दीपश्री सोपटे यांनी सौ गीता यांची ओटी भरली .गौरेश ,साईदीप ,साईनंद यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना पुष्पगुच्छ प्रदान केले.विठोबा बगळी यांनी सूत्रसंचालन केले आमदार दयानंद सोपटे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले केक कापून गुरुदास सोपटे यांचा 60 वा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवरासोबत नागरिक मोठय़ा संखेने उपस्थित होते.