रेल्वे वाहतुकीमुळे कामाला होतोय विलंब, मंगळवारपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्मयता
प्रतिनिधी /बेळगाव
मिरज ते लेंढा दरम्यानच्या रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरणाचे काम केले जात आहे. तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट बंद ठेवून तेथे ट्रक घालण्याचे काम सुरू आहे. काम युद्धपातळीवर सुरू असले तरी रेल्वेच्या वाहतुकीमुळे कामाला विलंब होत आहे. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत काम पूर्ण होण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.
तानाजी गल्ली येथील रेल्वेगेट शनिवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आले. जुन्या ट्रकच्या बाजूने नवीन दोन ट्रक बसविण्यात आले आहेत. याचसोबत भूमिगत वाहिन्याही घालण्यात आल्या आहेत. पुढील काळात जुना ट्रक हटवून नवे दोन टॅक ठेवले जाणार आहेत. रेल्वेगेटनजीक असणारे पेव्हर्स ट्रक दुरुस्तीसाठी काढण्यात आल्याने त्या ठिकाणी कॉंक्रिट घालण्यात आले आहे. सोमवारी रात्रीपर्यंत 80 टक्के काम पूर्ण झाले आहे.
रेल विकास निगमकडून युद्धपातळीवर जरी काम सुरू असले तरी रेल्वेची वाहतूक सुरू असल्याने कामाला विलंब होत आहे. सोमवारी दिवसभरात सात ते आठ रेल्वे मिरजच्या दिशेने तर तितक्मयाच रेल्वे बेळगावच्या दिशेने आल्या. रेल्वे आल्यानंतर काम थांबवून रेल्वे मार्गस्थ करावी लागत होती. यामुळे कामाला विलंब होत आहे. सोमवारी काँक्रिट घालण्यात आले असून उर्वरित काम मंगळवारी सायंकाळपर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज रेल्वे कर्मचाऱयांनी व्यक्त केला.