प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्मयातील 65 गावांना जलजीवन मिशन योजनेंतर्गत पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याची मागणी भाजप ग्रामीण मंडळाने केली आहे. यासंबंधी सोमवारी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱयांना निवेदन देण्यात आले आहे.
पक्षाचे ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव, प्रदीप पाटील, भुजंग सालगुडे, परशराम पाटील, तानाजी चौगुले, चंद्रशेखर वक्कुंद आदींनी अधिकाऱयांची भेट घेऊन पाणीपुरवठय़ासंदर्भात त्यांना निवेदन दिले. बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्राच्या कार्यक्षेत्रातील 65 गावांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली
आहे.