वार्ताहर/ किणये
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने तालुक्मयात हाहाकार माजवला. बुधवारी पावसाचा जोर वाढला असून दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
वादळी वाऱयासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी झाडे व झाडांच्या फांद्या तुटून पडण्याचे प्रकार घडले. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.
अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पाणी आले होते. बऱयाच ठिकाणच्या शिवारातील बांध फुटले आहेत. भातपिकासह इतर पिके पाण्याखाली गेली असल्याने ती कुजण्याचा धोका निर्माण झाला आहे.
किणये-संतिबस्तवाड भागातील मुंगेत्री नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. संतिबस्तवाडजवळील मुंगेत्री नदीवरील जुना पूल पाण्याखाली गेला असून नदीच्या आजूबाजूच्या शेतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे मंडोळी-सावगाव रस्त्यावरील पुलावर पाणी आल्याने दोन्ही गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे.
कर्ले-बेळवट्टी रस्त्यावर पाणी आल्यामुळे आजूबाजूच्या शिवारातील भातपिकाचे नुकसान होण्याची शक्मयता आहे.
सोनोली रस्त्याला नदीचे स्वरुप
सोनोली रस्त्याला नदीचे स्वरुप आले होते. रस्त्यावरून वाहतूक करताना वाहनधारकांना बरीच कसरत करावी लागत आहे. मच्छे, पिरनवाडी आदी भागात काही जणांच्या घरांमध्ये पाणी शिरले होते. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.