मृग नक्षत्राच्या पहिल्या-दुसऱया दिवशी पाऊस, मात्र तिसरा दिवस कोरडा, खरिपासाठी पोषक वातावरण
वार्ताहर / किणये
तालुक्मयात खरीप हंगामाची धांदल सुरू झाली आहे. मंगळवार दि. 8 पासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे. नक्षत्राचे दोन दिवस तालुक्मयात बऱयापैकी पाऊस झाला. मात्र, मृग नक्षत्राच्या तिसऱया दिवशी गुरुवारी पावसाने विश्रांती घेतली. सध्या खरीप हंगामासाठी पोषक वातावरण असल्यामुळे शेतकऱयांची शिवारामध्ये लगबग सुरू झाली आहे.
यंदा वळीव पावसाने बऱयापैकी हजेरी लावली होती. यामुळे शिवारातील मशागतीची कामे चांगल्या पद्धतीने झाली. तर मृग नक्षत्राच्या तोंडावर झालेल्या वळिवामुळे गेल्या पाच-सहा दिवसांपूर्वी पेरणीपूर्व मशागतीची कामे खोळंबली. गुरुवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे भातपेरणी तसेच कोळपणी करण्यात शेतकरी मग्न
होते.
तालुक्मयाच्या बस्तवाड, हलगा, धामणे, येळ्ळूर, पिरनवाडी, मच्छे, नावगे, बेळगुंदी, हिंडलगा, कंग्राळी, कडोली, कणबर्गी, निलजी, सांबरा आदी भागात धूळवाफ पेरणी करण्यात आली आहे. सुरुवातीला केलेल्या धूळवाफ पेरणीची बऱयापैकी उगवण झालेली आहे. उगवून आलेल्या भातपिकात कोळपणीची कामेही सुरू झालेली आहेत. तर शिल्लक राहिलेली भातपेरणी बैलजोडी व ट्रक्टरच्या साहाय्याने शेतकरी करतानाचे चित्र पहावयास मिळत आहे.
बस्तवाड-हलगा परिसरात पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. तालुक्मयाच्या पश्चिम भागातील किणये, बेळगुंदी, जानेवाडी, बिजगर्णी, बेळवट्टी, राकसकोप, बाची, उचगाव या भागात रोपलागवड अधिक प्रमाणात करण्यात येते. काही शेतकरी धूळवाफ पेरणी करतात.
पश्चिम भागात रताळी बांध तयार करणे, शिवारात शेणखत टाकणे आदी कामेही चालू आहेत. पश्चिम भागात रताळय़ाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेण्यात येते. सध्या ट्रक्टरच्या साहाय्याने रताळी बांध (मेरा) तयार करण्यात येत आहेत. यासाठी ट्रक्टरला प्रतितासाला 600 रुपये असे भाडे शेतकऱयांना द्यावे लागत आहे. तसेच शेतकऱयांनी रताळी लागवडीसाठी रताळी वेल लावलेली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात रताळी लागवडीला सुरुवात होणार
आहे.
तण उगवून येण्याचे प्रमाण कमी
यंदा गेल्या महिनाभरापासून अधूनमधून वळीव पाऊस झाल्यामुळे शिवारात बऱयापैकी ओलावा निर्माण झाला होता. यामुळे नांगरण व मशागत करणे सोयीस्कर ठरले. पेरणीच्या आधी पाऊस झाला असल्यामुळे शिवारात तण उगवून आले होते. या शिवारात मशागत करून पेरणी करण्यात आली आहे. यामुळे पेरणी केलेल्या शिवारात तण उगवून येण्याचे प्रमाण कमी होणार असल्याची माहिती शेतकऱयांनी दिली आहे.
मंगळवारपासून मृग नक्षत्राला सुरुवात झाली. मंगळवारी सकाळीच तालुक्मयाच्या सर्रास भागात नक्षत्राने जोरदार एंट्री केली. तर बुधवारीही बऱयापैकी पाऊस झाला. गुरुवार मात्र कोरडा गेला. पण भातपेरणी, कोळपणी व भुईमूग पेरणीसाठी पोषक वातावरण असल्यामुळे हंगाम साधण्यासाठी शेतकऱयांची धावपळ सुरू आहे.