ज्या दुकानात प्लास्टिक आढळेल त्यांचा परवाना करणार रद्द
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुक्मयात प्रदूषणाचे प्रमाण वाढत आहे. याला कारणीभूत म्हणजे प्लास्टिक. या आधी प्लास्टिक बंदीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. मात्र ते फोल ठरले. त्यामुळे चार दिवस कारवाई करून अधिकारीवर्ग गप्प बसतात, असे साऱयांचेच मत झाले आहे. मात्र, आपण त्यापैकी नसून तालुका प्लास्टिक मुक्तीसाठी जोरदार प्रयत्न करण्यात येणार आहेत. सरकारी काम आणि बारा महिने थांब अशी म्हण अधिकारीवर्गाच्या कारभारामुळे रुजत आहे. मात्र, यापुढे तसे प्रकार होणार नसून प्रत्येक तालुक्मयातील दुकानदारांनी प्लास्टिकबंदी करावी अन्यथा त्यांचा व्यावसायिक परवाना रद्द करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे तालुका पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
लॉकडाऊनआधी प्लास्टिक बंदीची मोहीम राबविण्यात आली होती. प्लास्टिकमुळे अनेक ठिकाणी कचऱयाचे साम्राज्य पसरत आहे. बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातही कचऱयाचे प्रमाण वाढत आहे. याला प्लास्टिकच कारणीभूत असून तालुक्मयातील सर्व दुकानदारांना यासाठीची नोटीस ग्राम पंचायतींच्या माध्यमातून बजावण्यात येणार आहे. त्यानंतरही प्लास्टिकमधून साहित्य देण्यात येत असल्याचे आढळल्यास कारवाई करून ते प्लास्टिक जप्त करण्यात येणार आहे. व्यावसायिक परवानाही रद्द करण्यात येणार आहे. यापुढे कोणत्याही दुकानात प्लास्टिक पिशवी दिसल्यास त्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बेळगाव तालुक्मयातील कोणत्याही व्यवसायाला परवानगी न घेता अनेक दुकाने सुरू करण्यात आली आहेत. त्यांनी रितसर परवाना ग्राम पंचायतींकडून घ्यावा. ज्यांच्याकडे वाहन परवाना आहे त्यांनी तो नूतनीकरण करून घ्यावा. याचबरोबर इतर व्यवसायासाठी लागणारे परवाने ग्राम पंचायतींमधून घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. ज्यांचे व्यावसायिक परवाने आहेत आणि जे व्यावसायिक प्लास्टिक पिशवीचा वापर करत आहेत त्यांचा परवाना रद्द करण्यात येणार असून दंडही आकारला जाईल, असे त्यांनी सांगितले.
बेळगाव तालुक्मयातील शहरालगत असलेल्या ग्राम पंचायतींच्या कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात प्लास्टिकचा कचरा दिसून येत आहे. सध्या काही ग्राम पंचायतींमध्ये घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक गावात घंटागाडी फिरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सरकारकडे तसे पत्रही पाठविण्यात येणार आहे. मात्र, नागरिकांच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यावर कचरा फेकण्याचे प्रमाण वाढले आहे. घंटागाडीत कचरा दिल्यास ते सोयीचे ठरणार आहे. मात्र, याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. दुकानदारांनी यापुढे प्लास्टिकमधून साहित्य विक्री केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. याकडे दुकानदारांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्लास्टिक टाळावे व कागदी पिशव्यांना प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
ता. पं. कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी
या आधीही प्लास्टिकमुक्तीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. सरकारने प्लास्टिक बंदी केली आहे. त्यामुळे आता तालुक्मयातील व्यावसायिकांनी प्लास्टिक बंदी करावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे. प्लास्टिक वापरणाऱयांचा व्यावसायिक परवाना रद्द करण्यात येईल व दंडही आकारण्यात येईल. नागरिकांनीही कापडी पिशव्या वापराव्यात. ज्यांच्याकडे व्यावसायिक परवाना नाही त्यांनी तो संबंधित ग्राम पंचायतींमधून काढून घ्यावा व ज्यांचा आहे त्यांनी तो नूतनीकरण करून घ्यावा. यापुढे तालुक्मयात प्लास्टिक पिशवीतून साहित्य देणाऱया दुकानदारांवर कारवाई करण्यात येणार आहे.