वार्ताहर / दोडामार्ग:
रविवारी झालेल्या चक्रीवादळाचा फटका तिलारी खोऱयातील अनेक गावांना बसला आहे. तिलारी नदीपात्रालगत असलेल्या असंख्य केळी, सुपारीच्या बागायती अक्षरशः जमीनदोस्त झाल्या आहेत. कोनाळ येथील नाईक कुटुंबियांच्या जवळजवळ चार हजार केळीची झाडे जमीनदोस्त झाली आहेत. तर कृष्णा शांभा नाईक यांच्याही घराचे मोठे नुकसान झाले आहे.
गोव्यासह संपूर्ण कोकण किनारपट्टीत प्रचंड धुमाकूळ घातलेल्या तौक्ते वादळाचा फटका तिलारी खोऱयालाही बसला. खोऱयातील अनेक गावांमधील शेती बागायतीचे नुकसान झाले आहेत. केर, मोर्ले, तिलारी, सोनावल, पाळये, तेरवण-मेढे, घोटगे आदी गावातील सुपारी, नारळ, आंबा, काजू कलमे, केळी यांना फटका बसला आहे. यातीलच कोनाळ गावातील काशीराम फटी नाईक, स्मिता नामदेव नाईक, शिवराम न्हानू नाईक, परेश न्हानू नाईक यासह अन्य नाईक कुटुंबियांच्या मिळून जवळजवळ चार हजार केळीची झाडे अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. यात या नाईक कुटुंबियांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. कोनाळ येथीलच कृष्णा शांभा नाईक यांच्या घराला या वादळी पावसाचा तडाखा बसला. त्यांच्या घरावरील सर्व पत्रे वाऱयामुळे उडून गेले. घरावरील छप्पर अचानक उडून गेल्याने नाईक कुटुंबीय अडचणीत सापडले. त्यांनी तात्पुरत्या स्वरुपात प्लास्टिकचा वापर करत छप्पर झाकण्याचा प्रयत्न केला. कोनाळसह अन्य बऱयाच गावातील घरांनाही वादळाचा फटका बसला आहे. leteDuration