कृतवर्मा शतधन्व्याला पुढे म्हणाला-अरे शतधन्व्या! या सागराच्या उदरात द्वारका नगरी निर्माण करणे कुणाला शक्मय आहे काय? ही अचाट गोष्ट कृष्णाने करून दाखवली. देवांचा राजा इंद्रही त्याचा सेवक आहे. सर्व प्रकारची शस्त्रास्त्रे त्याची आज्ञा पाळतात. बलराम व कृष्ण हे ईश्वराचेही ईश्वर असल्याने त्यांची अवज्ञा माझ्या काया, वाचा अगर मनानेही होणार नाही. यांचा अपराध करून जो सुखी झाला असा या त्रिजगतात कुणी आहे काय? यांचे प्रताप ऐक-
अरे यांचिया द्वेषास्तव । सानुग कंसा पराभव । ज्यातें नमिती भूभुज सर्व । एवढें वैभव सांडवलें । प्रत्यक्ष तुवां देखिला नयनीं । सतरा वेळ समराङ्गणीं। मागधाऐसा प्रतापतरणी । विरथ जीवदानीं सोडिला। मागधाऐसा प्रतापवंत । सतरा वेळ गेला विरथ। लज्जा पावला नृपचक्रांत । हें काय विदित तुज नाहीं । ऐसियासिं विरुद्धाचरण । सहसा माझेनि न करवें जान । तूंहे तयांसि होयीं शरण । कीं आश्रय आन विचारिं । कृतवर्म्याची निराश गोठी । ऐकोनि शतधन्व्याचे पोटीं । कल्पना उठती कोटय़ानुकोटि। आश्रय सृष्टी नाळोचे । कृतवर्म्यांनें निराकरिला । मग तो अक्रूरापासीं गेला । तेणें काय त्या विचार कथिला । कौरवपाळा तो परिसें ।
कृष्णाचा द्वेष केल्यामुळे कंसाने आपले राज्य संपत्ती सर्व गमावले. शेवटी कृष्णाने त्याचा वध केला. मगधाधिपती जरासंधाने मथुरेवर सतरा वेळा स्वाऱया केल्या. प्रत्येक वेळी कृष्णाने महापराक्रमी, महाबलवान जरासंधाचा पराभव केला व त्याला विरथ करून लाजवून पळवून लावले, हे तर तूही स्वतः पाहिले आहेस. अशा पराक्रमी वीराचे वैर पत्करणे मला तरी शक्मय होणार नाही. शतधन्व्या! मला विचारशील तर तूही त्याचे पाय धरावेस, त्याला शरण जावेस व आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करावास हेच उत्तम! कृतवर्म्याने सहाय्य करायला नकार दिल्यावर निराश झालेला शतधन्वा आता अक्रूरापाशी आला, तेव्हा काय घडले ते ऐक, असे महामुनी शुकदेव परिक्षिती राजाला सांगतात.
शतधन्वा म्हणे अक्रूरातें ।
पाठीराखा तूं होय मातें ।
ऐसिये समयीं आश्रयातें। मी याचितों तुजलागीं ।
ऐसा याचिला अक्रूर । तोही तैसेंचि उत्तर ।
बोलिला होऊन विवेकपर । न्यायनि÷gर तेणेंसी ।
जाणोनि ईश्वराचिया बळातें । कोण जाणता विरोधातें ।
प्रवर्तेल हें विवरिं चित्तें । मग साह्यतें तूं याचीं ।
यांचा प्रताप देखोनि दृष्टी । अद्यापि विरोध धरिसी पोटीं ।
तथापि ऐकें समूळ गोठी । वास्तव कोटी पैं यांची ।
रामकृष्ण हे भासती भिन्न । परी हे ब्रह्मसनातन ।
ईश्वरामाजि ईश्वरपण । स्फुरे संपूर्ण यांचेनि ।
जो हें विश्व लीलेंकरून । सृजी पाळी ग्रासी जाण ।
तो दो रूपें अवतरून । भूभारहरण करूं आला ।
ऐसा जो कां विश्वस्रष्टा । लीलाविग्रह हे त्याची चेष्टा ।
सहसा नुमजे विवेकभ्रष्टां । महापापि÷ा दुरात्मयां ।
देवदत्त परुळेकर