बेकायदा रेती उपसामुळे नदीपात्र रुदांवले : सरकारी यंत्रणेकडून दुर्लक्ष,शेतकऱयांच्या शेती, बागायती पाण्याखाली
प्रतिनिधी /पेडणे
उगवे येथील तेरेखोल नदीकिनारी असलेल्या उगवे पेडणे भागातील स्थानिक शेतकरी यांच्या शेती तसेच बागायतीची हजारो चौरस मीटर शेतजमिनी आणि बागायती, नारळाची झाडे तेरेखोल नदी पात्राने गिळंकृत केली. त्यांची नुकसानी आणि परत जमिन होती तशी कोण करून देणार, आम्ही आमच्या जमिनी पोटच्या मुला बाळा प्रमाणे जपल्या होत्या, मात्र तेरेखोल नदीत बेकायदा रेती उपसा करण्याचा हिरवा कंदील खाण आणि भूगर्भ खात्याने दिल्यामुळे आमच्या पूर्वजांच्या जमिनी बागायती नदीच्या पात्रात गिळंकृत झाल्या त्याला जबाबदार कोण, आम्हाला कोण न्याय देणार असा आक्रोश जमीन मालकांचा आहे. आता सरकारने याची दखल घेतली नाही तर न्यायालयात धाव घेणार असा इशारा शेतकऱयाने दिला.
तेरेखोल नदीपाञात अमर्यादा रेती उपसा
तेरेखोल नदीत अमर्याद रेती उपसा होत असल्याने उगवे येथील तसेच इतर परिसरातील हजारो चौरस मीटर जमीन आणि बागायतिच्या जमिनी नदीचे पात्र रुंदावत गेल्याने शेत जमिनी आणि बागायतीचे रुपांतर तेरेखोल नदीत झाले आहे.
सरकारी अधिकारी रेती व्यावसायिकाचे हातातील बाहुले
खाण भूगर्भ खात्याचे दुर्लक्ष झाल्याने आणि बेकायदा रेती व्यावसायिकाना या अधिकाऱयांचे पाठबळ असल्याने रेती माफियाचे कारनामे दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारी अधिकारी यांना मोठय़ा प्रमाणात महिन्याला हप्ते देऊन रेती व्यावसाय सुरू असते. सरकारी अधिकारी हे रेती व्यावसायिकांचे हातचे बाहुले बनले आहे.
लेखी तक्रार दाखल : उदय महाले
बागायतदार उदय महाले यांनी सांगितले की आमच्या या जमीनी बेकायदा रेती उपसा होत असल्याने नदीचे पात्र आमच्या बागायतीत आणि शेतजमिनीत आले. हजारो चौरस मीटर जमिनी गेल्या. अनेक पिढय़ाची चांगली सुपिक शेतजमीन मुला, बाळासाठी राखून ठेवलेली, लागवड केलेले नारळाची झाडे, भातशेती नदीच्या पात्रात गिळंकृत केली. त्याला जबाबदार कोण असा सवाल उदय महाले यांनी उपस्थित करून आम्ही सरकारला लेखी निवेदन अनेक वेळा दिले आता परतही निवेदन देवून त्याची दखल घेण्याची मागणी केली आहे. सरकारने ठोस पाऊले उचलून आम्हाला न्याय द्यावा. आमच्या पूर्वजांच्या जमिनी पुढील पिढीसाठी परत मिळवून देण्याची त्यांनी मागणी केली आहे. तक्रारीच्या प्रति मुख्यमंत्री ,खाण संचनालाय,उपजिल्हाधिकारी ,उत्तर गोवा जिल्हाधिकारी व पेडणे ममलेदार यांना निवेदन सादर आहे.
बांधकामासाठी रेती मुख्य घटक
बांधकाम क्षेत्रात आवश्यक असलेला रेती हा मुख्य घटक आहे. निसर्गनिर्मित रेती ही पेडणे तालुक्मयातील तेरेखोल व शापोरा या दोन नद्यांत मोठय़ा प्रमाणात उपलब्ध आहे. ती काढण्यासाठी सरकारच्या खाण आणि भूगर्भ खात्याकडून परवाने घ्यायचे असतात. परवाने देताना नियम घालून काही जणाना परवाने दिलेले आहेत. ज्यांच्याकडे परवाने आहेत, त्यांनी किती रेती काढावी ते त्याना माहित असणार. मात्र रेतीव्यावसायिक अमर्याद रेती उपसा करत आहे. या अमर्याद रेती उपासामुळे नदी किनाऱयांची परिसरातील शेती, बागायतीची भयानक स्थिती आहे त्याची अधिकाऱयांनी शापोरा आणि तेरेखोल नदी किनारी भेट देवून पाहणी करावी . बागायादारांची होत असलेली नुकसानी त्याना भरपाई कोण देणार, दिवसेंदिवस नदीचे पात्र रुंदावत चालले आहे. आता हिच नदी सार्वजनिक मालमत्तेची प्रचंड प्रमाणात हानी करायला तयार झाली आहे.
अमर्याद रेती उपसा चालू असताना ज्याच्या संरक्षणासाठी खाते कार्यरत आहे आणि त्याचे अधिकारी मात्र दुर्लक्ष करित असल्याचे चित्र दिसते. अमर्याद रेती उपसा करण्यासाठी शेकडो होडय़ा पहाटे आणि सायंकाळी 6 नंतर मोठय़ा प्रमाणात दोन्ही नद्यामध्ये रेती उपसा करण्याची जीवघेणी स्पर्धा चालू असल्याचे भयंकर चित्र दिसत आहे .
नदी किनारी भागातील बागायतीतील कल्पवृक्षांची झाडे जलसमाधी घेत आहेत . राष्ट्रीय महामार्ग 66 पोरस्कडे येथील 500 मीटर लांबीच्या रस्त्याला पूर्णपणे धोका निर्माण झाला आहे .100 मिटर रस्ता नदीने गिळकृत केला आहे . हि स्थिती अशीच कायम राहिली तर तेरेखोल नदीकिनारी भागातून जेवढा लांबीचा रस्ता जात आहे तोही रस्ता हि नदी येणाऱया काळात गिळकृत करणार आहे. जसा रस्ता नदी गिळकृत करत आहे त्याच पोरसकडे येथे जात असले रेल्वे पुलालाही धोका निर्माण झाला आहे . हि राष्ट्रीय हानी वाचवण्यासाठी भूगर्भ खाते आणि पेडणेचे उपजिल्हाधिकारी रवीशेखर निपाणीकर , मामलेदार अनंत मळीक यांनी लक्ष घालून या नदीकिनारी काय चाललेय ते पहावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे .