45.49 कोटीची भरपाई : थेट बँक खात्यात जमा
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात मे महिन्यामध्ये तौक्ते वादळाने झालेल्या नुकसानीची 45 कोटी 49 लाख 33 हजार एवढी भरपाईची रक्कम अखेर प्राप्त झाली आहे. ही रक्कम तात्काळ प्रत्येक तालुक्मयाला वाटप करण्यात येऊन नुकसानग्रस्तांच्या थेट बँक खाती रक्कम जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिल्हय़ामध्ये 16 व 17 मे रोजी तौक्ते चक्रीवादळ घोंगावले होते. या वादामुळे समुद्रकिनाऱयावरील मच्छीमारांसह सहय़ाद्रीच्या पट्टय़ात असलेल्या ग्रामीण भागातही मोठे नुकसान झाले होते. या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून विविध राजकीय संघटनांनी मागणी केली होती. तसेच महसूल विभागाने या नुकसानीचे पंचनामे पंचायत समितीच्या कर्मचाऱयांच्या सहकार्याने केले होते. दरम्यान शासनाकडून या नुकसानग्रस्तांसाठी 45 कोटी 49 लाख 33 हजार रुपये एवढा निधी सिंधुदुर्गला पाठवण्यात आला आहे. यामध्ये तालुकानिहाय निधी तहसीलदारांच्या खाती जमा करण्यात आला आहे.
नुकसानग्रस्त तालुक्मयामध्ये सर्वाधिक मालवण तालुक्मयाला 11 कोटी 88 लाख 89 हजार, दोडामार्ग तालुक्मयाला 95 लाख 95 हजार, सावंतवाडी तालुक्मयासाठी 5 कोटी 34 लाख 55 हजार 700, वेंगुर्ले तालुक्मयासाठी 8 कोटी 1 लाख 300, कुडाळ तालुक्मयासाठी 7 कोटी 2 लाख 85 हजार 200, कणकवली तालुक्मयासाठी 2 कोटी 35 लाख 45 हजार, देवगड तालुक्मयासाठी 6 कोटी 52 लाख 66 हजार 800, वैभववाडी तालुक्मयासाठी 3 कोटी 29 लाख 96 हजार रुपये एवढा भरपाई निधी पाठवण्यात आला आहे. हा निधी नुकसानग्रस्तांच्या थेट बँक खात्यात जमा केला जात आहे. तालुकास्तरावर धनादेश काढून बँक खाती निधी जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.