प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रवाहाबाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्यावतीने माध्यमिक शिक्षकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. भाऊराव काकतकर महाविद्यालयात ही कार्यशाळा पार पडली.
अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रा. विक्रम पाटील होते. व्यासपीठावर उपसचिव डॉ. दीपक देसाई, खजिनदार एन. बी. खांडेकर, निवृत्त मुख्याध्यापक पी. पी. बेळगावकर, डॉ. पी. डी. काळे उपस्थित होते. गोजगा हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. व्ही. जाधव व कुदेमनी हायस्कूलचे मुख्याध्यापक पी. एच. जाधव यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. सूत्रसंचालन इदलहोंड हायस्कूलचे मुख्याध्यापक एस. एम. गुरव यांनी केले. बेनकनहळ्ळी शाळेचे मुख्याध्यापक पी. आर. पाटील यांनी आभार मानले.