प्रतिनिधी / बेळगाव
यावषी दहावीची परीक्षा होणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली असली तरी सरकार मात्र दहावी आणि बारावी परीक्षा घेणारच, असे सांगत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पालकवर्गातून दहावी परीक्षा रद्द करावी, अशी मागणी होत आहे. काही पालक संबंधित शाळेतच दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घ्यावी, अशी मागणीही करत आहेत. त्यामुळे सरकार आता कोणती भूमिका घेणार, याकडे साऱयांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
एसएसएलसी परीक्षेला विद्यार्थ्यांना दुसऱया शाळांमध्ये अथवा परीक्षा केंद्रांमध्ये न पाठविता त्यांच्या त्यांच्या शाळांमध्येच परीक्षा घ्याव्यात. कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. परीक्षेला बसणाऱया लाखो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता एकाला जरी संसर्ग झाला तरी कोरोना वाढू शकतो. त्यामुळे यंदाच्या वषी विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच एसएसएलसी परीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांतून होत आहे. मात्र, सरकार याला हिरवा कंदील दाखविणार का? असा प्रश्नही उपस्थित करण्यात येत आहे.
दुसऱया परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना पाठविण्यास पालकांचा नकार
सध्या बारावी परीक्षा घेण्यात येणार असून दहावी परीक्षेबाबत सरकारने चालढकल सुरू केली आहे. त्यामुळे अजूनही एसएसएलसी परीक्षा होणार की नाही? अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सरकारने एलकेजीपासून महाविद्यालयापर्यंत सर्व वर्ग अद्याप सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. लहान मुलांचा विचार करून शाळासुद्धा मागील वर्षभरापासून बंद आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सरकारने सध्या तरी शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविलेला नाही. प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांची चिंता असते. कोरोनामुळे यंदा या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना दुसऱया परीक्षा केंद्रांवर पाठविण्यास इच्छुक नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत.
पालक एकत्र येण्याच्या हालचाली सुरू
याचबाबत बेळगावमधील विविध शाळांमध्ये असणाऱया विद्यार्थ्यांचे काही पालक एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एसएसएलसीला बसणाऱया सर्वच मुलांच्या पालकांनी एकत्रितपणे याबाबत सरकारवर दबाव आणल्यास सरकार नक्कीच विचार करू शकते. त्यामुळे सरकारने ज्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत त्या शाळांमध्येच परीक्षा केंद्र करावे.
कॉपी किंवा तत्सम प्रकार टाळण्यासाठी बाहेरील परीक्षक नेमावेत. बेळगावमधील ज्या पालकांची मुले यंदा एसएसएलसी परीक्षेला बसणार आहेत त्या सर्वांच्या पालकांनी याबाबत विचारविनिमय करणे आवश्यक असून परीक्षा संबंधित शाळांमध्येच घ्याव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.