प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मागील दीड वर्षापासून बंद असलेल्या शाळा आजपासून सूरू होणार आहेत़ राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी नुकतेच 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू करणार असल्याची माहिती दिली होत़ी रत्नागिरी जिह्याचा विचार करता प्राथमिकच्या 1 हजार शाळा व माध्यमिकच्या 500 अशा एकूण दीड हजार शाळांमध्ये घंटा घणघणणार आहे.
शाळा बंद असल्याने मागील काही महिन्यांपासून ऑनलाईन शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यात आला होत़ा मात्र यात गावोगावी नेटवर्कचा प्रॉब्लेम होत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होत होत़े यामुळे मुलांच्या भवितव्याची चिंता पालकांना लागून राहिली हात़ी आता शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने विद्यार्थी व पालकवर्गात समाधान व्यक्त करण्यात येत आह़े दरवर्षी शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ होत असताना नवागतांच्या स्वागताचा आगळावेगळा प्रवेशोत्सव पहावयास मिळत़ो कोरोनाच्या संकटामुळे या परंपरेला खंड पडला होत़ा
गतवर्षी रत्नागिरी जिल्हय़ात 13 हजार 907 बालकांचा नव्या शैक्षणिक वर्षात इ. 1 लीच्या वर्गात प्रवेश घेतला होता. राज्याच्या शालेय शिक्षण विभागस्तरावर यापूर्वी 1 ते 14 जून या कालावधीत उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर राज्यातील शाळा 15 जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगितले होते. जिल्ह्य़ातील यावर्षी इ. 1 लीच्या वर्गात 11 हजार विद्यार्थी प्रवेशकर्ते झाले आहेत. पण मागील जून 2021 मध्ये शाळांच्या शैक्षणिक कामकाजाला प्रारंभ ऑनलाईन पध्दतीनेच जिल्हय़ात एकूण 75 हजार विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शैक्षणिक सत्राचा प्रारंभ झाला होता. शाळांमध्ये विद्यार्थ्यांची यावेळेसह कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे उपस्थिती राहिली नाही.
शाळांमधील लसीकरण, टेस्टिंग सेंटर केव्हा बंद होणार?
राज्यातील बहुतांशी शाळा सोमवारपासून सुरू करण्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र अद्याप शहरातील काही शाळांमध्ये लसीकरण केंद्र व तपासणी केंद्र कार्यान्वित असल्याने ती केव्हा बंद होणार आणि या शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्न पालकवर्गासमोर निर्माण झाला आहे.
शहरी भागातील इयत्ता 8 वी ते इ. 12 वी व ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते इयत्ता 12 वीचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नुकताच आदेश काढला आहे. त्यानुसार शिक्षणाधिकारी स्तरावरून या शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष बाब म्हणजे सोमवारपासून शाळा सुरू होत असतानाही अद्याप शिक्षकांची कोविड डय़ुटी सुरूच आहे. यामुळे शिक्षकांसमोरही शाळेत कसे जायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शाळांमधील कोविडविषयक कामकाज व शिक्षकांची कोविड डय़ुटी तत्काळ रद्द करण्यात यावी, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले.
शाळांमधील कोरोनाविषयक कामकाज तत्काळ बंद करा!
शिक्षकांची कोरोना डय़ुटी व शाळांमधील कोरोनाविषयक कामकाज तत्काळ बंद करा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष सागर पाटील यांनी सांगितले. शिक्षकांची कोरोना डय़ुटी व शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार करूनही या बाबत अद्यापही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिक्षण विभागाकडेही या बाबत तत्परता पहायला मिळत नाही. शिक्षकांची कोरोना डय़ुटी रद्द करण्याबाबत व शाळांमधील कोरोनाविषयक कामकाज बंद करण्याबाबत शिक्षणाधिकारी स्तरावरून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा होणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
लांजात 215 पैकी 152 शाळा होणार सुरू
लांजाः कोरोनाच्या महामारीत तब्बल 2 वर्षांनी जिल्हा परिषदांच्या शाळांची घंटा आजपासून घणघणणार आहे. यामध्ये लांजा तालुक्यातील 215 पैकी 152 शाळा सुरू होणार असल्याचे तालुका शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांची शाळा सुरुची प्रतीक्षा संपली आहे. मात्र विद्यार्थी व पालकांच्या मनामध्ये कोरोनाची धाकधुक असणार आहे.
लांजा तालुका शिक्षण विभाग आजपासून सुरू होत असलेल्या प्राथमिक शाळांच्या पहिल्याच दिवसासाठी सज्ज झाला आहे. कोरोना काळ अजूनही सुरु असल्याने काळजी, सतर्क राहून काळजी घेण्याच्या सूचना शिक्षकांना केल्या आहेत. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 215 प्राथमिक शाळा आहेत. काही शाळा शहरात तर उर्वरित शाळा ग्रामीण भागामध्ये आहेत. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत असलेल्या शाळा 63 असून या शाळा बंद राहणार आहेत. तर पचवी ते त्यापुढील वर्गापर्यंतच्या शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील 215 पैकी इयत्ता पाचवीपासून पुढील वर्गाच्या एकूण 152 शाळा सुरू होणार आहेत.