प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीसाठी दुसऱया टप्प्यातील अर्ज दाखल करण्याच्या दुसऱया दिवशी 364 अर्ज उमेदवारांनी दाखल केले आहेत. दुसऱया टप्प्यात 218 ग्राम पंचायतींच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्याच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस शुक्रवारी झाला. त्यामुळे आता दुसऱया टप्प्यातील निवडणुकीकडे निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी गुंतले गेले आहेत.
दुसऱया टप्प्यामध्ये सौंदत्ती, रामदुर्ग, चिकोडी, निपाणी, अथणी, कागवाड आणि रायबाग या सात तालुक्यातील ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्हय़ातच निवडणूक होत आहे. त्यामुळे आता संपूर्ण निवडणुकीला रंग चढताना दिसत आहे. सोमवारी पहिल्या टप्प्यातील निवडणुकीतून अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे.