प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात उघडीप दिलेल्या पावसाने शनिवारी दुपारनंतर हजेरी लावली. वीजांच्या कडकडासह पडणाऱया पावसाने शहरासह जिह्यात पुनरागमन केले. या पावसाचा जोर दुसऱया दिवशी म्हणजे रविवारी कायम होता. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रिमझिम सरी कोसळत होता तर काही तासांसाठी पावसाचा जोर वाढत होता.
साताऱयासह जिह्याच्या विविध भागात शनिवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. उकाडा वाढल्याने घमाच्या धारा वाहत होत्या. आज पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला जात होता. तोच दुपारनंतर पावसाच्या हलक्या सरी कोसळू लागल्या. अडीच वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर वाढला. फक्त सातारा शहरात नव्हे तर जिह्यात पावसाने पुनरागमन केले. दोन तास पावसांची संततधार सुरू होती. पावसाचा जोर कमी जास्त होत होता. मध्यरात्रीही पावसाची रिपरिप सुरू होती. यामुळे सर्वत्र पाणी पाणी झाले होते. शहरातील खड्डे पुन्हा पाण्याने भरले. काही भागात घसरण निर्माण झाली. दुसऱया दिवशी म्हणजे रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाला. मात्र ढगाळ वातावरणामुळे गारवा निर्माण झाला. दिवसभर पडणाऱया पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते.