ऑनलाईन टीम/तरुण भारत
गुरुवारी देशात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला. आजपर्यंत हा आकडा पाचवर पोहोचला आहे. कर्नाटकात २, तर महाराष्ट्र, गुजरात, दिल्लीत प्रत्येकी एकाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. ओमायक्रॉननं चिंता वाढवली असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिलासादायक माहिती दिली आहे. भारतातील १८ वर्षांवरील ५० टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती मंडाविया यांनी दिली. हा देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं.
‘लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के लोकसंख्येचं लसीकरण पूर्ण झालेलं आहे. हा अभिमानाचा क्षण आहे,’ असं मंडाविया म्हणाले. गेल्या २४ तासांत १ कोटी ४ लाख १८ हजार ७०७ डोस देण्यात आले. देशात आतापर्यंत १२७.६१ कोटी डोस दिले गेले आहेत.