वृत्तसंस्था/ नवी दिल्ली :
देशात कोरोना संसर्गामुळे 21 दिवसांसाठीचा लॉकडाउनची संपूर्ण देशात घोषणा केंद्राने केली आहे. यामुळे घरातून काम करण्यासोबत अभ्यास, मंनोरंजन आदि विभागात इंटरनेटच्या माध्यमातून काम केले जाते. यासाठी इंटरनेटची आवश्यकता भासत होती, याच कारणामुळे मागील तीन आठवडय़ात देशात जवळपास 20 टक्क्मयांनी डाटाचा वापर वाढल्याची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती इंटरनेट एक्सेंज कंपनी सीआयएक्स यांनी दिली आहे.