ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात दैनंदिन रुग्णवाढीचा आकडा मागील 12 दिवसांपासून तीन लाखांहून अधिक आहे. रविवारी पुन्हा 3 लाख 68 हजार 147 बाधितांची नोंद झाली. तर 3417 रुग्ण दगावले. मृतांचा दैनंदिन आकडाही मागील आठवड्यापासून तीन हजारांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे देशात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे दिसून येते.
देशात आतापर्यंत 1 कोटी 99 लाख 25 हजार 604 लोक कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यामधील 1 कोटी 62 लाख 93 हजार 003 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. अजूनही 34 लाख 13 हजार 642 रुग्ण उपचार घेत असून, 2 लाख 18 हजार 959 रुग्ण दगावले आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 15 कोटी 71 लाख 98 हजार 207 नागरिकांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 29 कोटी 16 लाख 47 हजार 037 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 15 लाख 04 हजार 698 कोरोना चाचण्या रविवारी (दि.02) करण्यात आल्या.