प्रतिनिधी/ सातारा
मी उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा सभापती असताना ज्या वेगाने काम करत होते. ते सातारा विकास आघाडीतील काहीजणांना पहावलेले नाही. त्यामुळेच त्यांनी माझ्या प्रभागातील कामे होवू न देण्याचा फंडा वापरला गेला. माझ्या प्रभागाशेजारीला प्रभागातील मालशे पुलाचे काम होते परंतु माझ्याच प्रभागातील कामाला सातारा विकास आघाडीतील काही पदाधिकाऱयांचा का विरोध, असा रोकडा सवाल सातारा विकास आघाडीचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी उपस्थित केला आहे.
दोन दिवसांपूर्वी साताऱयात सातारा विकास आघाडीर्चीं एका ठिकाणी बैठक झाली. त्या बैठकीत त्यांनी मुद्दा उपस्थित केला असल्याचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के सांगितले. ते म्हणाले, सातारा विकास आघाडीमधील काही पदाधिकाऱयांच्या आडमुठय़ा भूमिकेमुळे माझ्या प्रभागावर अन्याय झाला आहे. मी उपनगराध्यक्ष आणि पाणी पुरवठा सभापती असताना ज्या वेगाने काम केले. तळागाळातील लोकांची कामे अडीच वर्षात देह वेडा होवून कामे केल्याचे काहींना पहावले नाही. माझ्या कामांची पद्धत त्यांना पसंद पडली नाही. त्यामुळे माझ्या वॉर्डातील प्रस्तावित कामांच्या फाईल गायब करणे, मंजूर कामे होवू देवू नये अशा स्वरुपाचे राजकारण आमच्याच आघाडीत होते आहे. आघाडीचे नेते खासदार उदयनराजेंनी पाच वेळा फोन करुन खारी विहिर येथील मुस्मिल समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी जागा मिळवून दिली. त्याच भवनाला कोण आडगे पडले. माझ्या प्रभागालगतीची कामे झाले. शेजारील मालशे पुल 50 लाख खर्चून झाला. बोगद्यातील पूल झाला परंतु माझ्याच प्रभागातील डॉ. गजाभाऊ कुलकर्णी यांच्या घरासमोरील बालाजीनगर येथील पुल व डॉ. पाटील यांच्या शेजारील पुलाला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आणूनही माझेच विषय कधीच अजेंडय़ात घेतले गेले नाहीत. त्यामुळे माझे महत्वकांक्षी प्रकल्प अपूर्ण राहिले आहेत. याला पालिकेतील काही जण जबाबदार आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.