प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोना काळात टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर महावितरणची बिले मोठय़ा प्रमाणात थकित होत़ी प्रसंगी जोडणी तोडण्याची भूमिका महावितरणने घेतल़ी गेल्या 4 दिवसात महावितरणने रत्नागिरी जिह्यात शेकडो वीज जोडण्या तोडल्या आहेत. या कारवाईच्या धसक्याने थकित बिलांपैकी 6 कोटी तर नियमित बिलांपैकी 6 कोटी रुपये वसूल झाल्याची प्राथमिक आकडेवारी हाती आली आह़े
गेल्या चार दिवसापासून रत्नागिरी जिह्यात महावितरणने वसुलीची धडक मोहीम हाती घेतली आह़े जे ग्राहक थकबाकी भरणार नाहीत, अशा लोकांचा वीजपुरवठा तोडून टाकण्याचे धोरण महावितरणने स्वीकारले आहे. प्रत्येक उपविभागात वसुलीची धडक मोहीम सुरू आहे. अखेरच्या क्षणी पैसे भरणाऱया ग्राहकांना वीज तोडणीतून सवलत देण्यात येत आह़े
वीज तोडण्यासाठी कर्मचारी आले हे पाहून अनेकांनी थकबाकीची रक्कम महावितरणकडे जमा केली आह़े 1 फेब्रुवारीपासून 6 कोटी रुपये एवढी थकबाकी महावितरणच्या तिजोरीत जमा झाली आह़े याचवेळी नियमित बिलापैकी आणखी सहा कोटी रुपये जमा झाले आहेत़
लवकरात लवकर रकमा जमा करा
महावितरणच्या अधिकाऱयांनी सांगितले की, थकबाकी असलेल्या वीज ग्राहकांनी ताबडतोब थकित बील महावितरणकडे जमा कराव़े नियमित ग्राहकांनीही आलेले बील दिलेल्या मुदतीत जमा करून ‘थकित’ यादीत जाणे टाळावे. चांगल्या सेवेसाठी लवकरात लवकर बील जमा करून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.