रात्रीच्यावेळी पारा 14 अंशांवर : आठ दिवसांपासून थंडीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
डिसेंबर महिन्याच्या अखेरीला गुलाबी थंडी शहर तसेच परिसरात पडत आहे. हुडहुडीमुळे रात्रीच्यावेळी शेकोटय़ा पेटत आहेत. तर पहाटेच्यावेळी मात्र दाट धुक्मयामुळे समोरील व्यक्ती दिसत नाही, असे चित्र पहायला मिळत आहे. धुक्मयाने झाकोळलेल्या रस्त्यावरूनच मार्ग काढत वाहने ये-जा करीत आहेत. या आल्हाददायक धुक्मयाचा फोटो काढण्याचा मोह प्रत्येकालाच होत आहे.
मागील आठ दिवसांपासून शहरातील थंडीच्या प्रमाणात वाढ झाली. यामुळे कपाटात ठेवलेले स्वेटर तसेच इतर उबदार कपडे बाहेर काढण्यात आले. पहाटेच्या बोचऱया थंडीमुळे मॉर्निंग वॉकर्सही काहीसे उशिरा बाहेर पडत होते. शेकोटय़ा पेटवून ठिकठिकाणी शरीराला उष्मा देण्याचा प्रयत्न केला जात होता. बोचऱया थंडीमुळे अंगावर शहारा येत होता. त्यामुळे रात्री आठनंतर घराबाहेर पडताना विचार करावा लागत होता. दिवसा 28 ते 30 अंश असणारा पारा रात्रीच्यावेळी 14 अंशांपर्यंत पारा खाली घसरत आहे.
लाईट लावून चालवावी लागताहेत वाहने
धुक्मयाचे प्रमाण वाढल्यामुळे पहाटेच्यावेळी प्रवास करणाऱयांना लाईट लावून वाहने चालवावी लागत आहेत. राष्ट्रीय महामार्गावर समोरच्या वाहनाचा धुक्मयामुळे अंदाजही येत नसल्यामुळे गती कमी ठेवून प्रवास करावा लागत आहे. धुके पाहून अनेकांनी तर प्रवास न करण्याचा निर्णय घेतला. धुक्मयाचे प्रमाण जास्त असल्याने वायफरचा वापर करत वाहने हाकावी लागत आहेत.
पिकांना बसतोय फटका
धुक्मयाचे प्रमाण वाढल्यामुळे वातावरण जरी आल्हाददायक वाटत असले तरी पिकांना मात्र फटका बसतोय. विशेषतः फळ बागायतदारांना या धुक्मयामुळे आर्थिक तोटा होणार आहे. काजू, आंबा या झाडांना आता मोहोर येत असतानाच धुक्मयामुळे हा मोहोर गळून पडण्याच्या मार्गावर आहे. यामुळे फळ बागायतदार चिंतेत सापडला आहे.