प्रतिनिधी / सातारा :
प्रभाग 15मध्ये नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न एरणीवर आहेत. परिसरातील नागरिकांच्या हिताचे प्रश्न आहेत. हे विषय आम्ही एक वर्षापूर्वीच मंजूरीसाठी दिलेले आहेत. हे विषय जाणूनबुजून घेत नाही, असे लक्षात आले आहे. आपण माझ्या वॉर्डाचे विषय लवकरात लवकर मार्गी लावावेत, अन्यथा मला नागरिकांच्या हिताकरता आपल्या दालनात आंदोलन करावे, लागेल असा इशारा भाजपाच्या नगरसेविका आशा पंडित यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. दरम्यान, नगराध्यक्षा माधवी कदम यांनी पंडित यांच्या वॉर्डात जास्ती कामे झाली आहेत. त्यांचे आरोप हे राजकीय आकासापोटी आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
नगरसेविका आशा पंडित यांनी दिलेल्या नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, माझ्या प्रभागातील नागरिकांच्या हिताचे विषय घेतले जात नाहीत. हे माझ्या लक्षात आले आहे. एकाच मिटींगमध्ये 500 विषय घेवून गिनीज बुकात नोंद केली आहे. यामुळे प्रशासनावर कामाचा तसेच आर्थिक नियोजनाचा बोजा पडला आहे. यामुळे पालिकेची आर्थिक घडी पुर्णपणे कोलमडली असून आपणच जबाबदार आहात. शहरातील नागरिकांच्या हिताचे विषय न घेता बिनकामाचे विषय घेतले गेले. माझ्या वॉर्डातील नागरिक नियमित करदाते आहेत. त्यांच्या कररुपाने आलेल्या पैशाचा आपण त्यांना मोबदला देवू शकत नाही. याच्या पेक्षा मोठे दुख नाही. आपण माझ्या वॉर्डाचे विषय लवकरात लवकर घ्यावेत, अन्यथा मला नागरिकांच्या हिताकरता आपल्या दालनात आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे.
यावरुन नगराध्यक्षा माधवी कदम म्हणाल्या, त्यांच्या वॉर्डाला आशा पंडित यांच्या नावावर 87 लाखांची 24 कामे मंजूर आहेत. अमोल मोहितेच्या यांच्या नावावर 45 लाखाच्या आसपास कामे मंजूर आहेत. जवळजवळ दीड कोटींची कामे मंजूर आहेत. तसेच स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांच्या नावावर 35 लाखाचे एक काम मंजूर आहे. पावणे दोन कोटीपर्यंत ही बांधकामची कामे झाली आहेत. आरोग्य, पाणी पुरवठा इतर विभागातून कामे झाली आहेत. त्यांच्या एका वॉर्डाला पावणे दोन कोटींची कामे मंजूर आहेत. काही कामांची वर्क ऑर्डर झाली आहे. काही कामे सुरु आहेत. सातारा विकास आघाडीच्याही नगरसेवकांची कामे थांबली आहेत. मग हे काम म्हणतात आमच्या वॉर्डाला कामे नाहीत. ते कसे काय ठरवणार नगराध्यक्षांनी कुठे निधी द्यायचा. मला नागरिकांनी मते दिली आहेत. महाराजांचे लक्ष आहे त्या वॉर्डावर आमच्या नेत्यांनी सांगितल्याने निधी दिला आहे. त्यांनी राजकीय द्वेषातून आरोप केले गेले आहेत. आम्ही त्यांचे कोणतेही काम अडवले नसून तसे पत्र आम्ही त्यांना देणार आहोत, असे त्यांनी सांगितले.