प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणातील नमन या लोककलेचा मान आणि सन्मान ज्या पध्दतीने शासन दरबारी व्हायला हवा होता तो मात्र झालेला दिसत नाही. कोकणातील नमन या लोककलेचे कलावंत संघटीत नसल्याने या चळवळीपासून दूर होते. पण आता या कलेला शासनदरबारी राजाश्रय मिळवून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हय़ातील सारे नमन कलावंत आता ‘कोकण नमन कलामंच, महाराष्ट्र राज्य’ या एकाच झेंडय़ाखाली आले आहेत. ही चळवळ पुढे जोमाने नेण्यासाठी जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर (पी.टी.) कांबळे यांची यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
या मातीत रुजलेल्या बहुरंगी नमन या लोककलेला व त्यातील लोककलावंत यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हाभरात या चळवळीने उभारी घेतलेली होती. शासन दरबारी नमन लोककलेचा झेंडा रोवण्यासाठी मागील काही दिवसांपासून संघटीत होण्यासंबंधी विचारविनिमय सुरू झालेला होता. त्यानुसार जिल्ह्य़ात प्रत्येक तालुकावार नमन लोककलावंतांच्या शाखा स्थापन करण्यात आल्या. या सर्व शाखांच्या माध्यमातून जिल्हासंघटन उभे राहण्यासाठी महत्वपूर्ण चर्चा बैठक प्रत्येक तालुक्यातील काही निवडक प्रतिनिधींच्या उपस्थितीत रत्नागिरीत पार पडली.
त्यावेळी झालेल्या चर्चेनंतर या संघटनाच्या माध्यमातून शासनस्तरावर नमन या लोककलेला राजाश्रय मिळवून देण्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी प्रथमच या संघटनाच्या माध्यमातून 23 सदस्यीय जिल्हास्तरीय संघटनेची स्थापना करण्यात आली. त्या संघटनेवर जिल्हाध्यक्षपदी प्रभाकर उर्फ पी.टी.कांबळे (रत्नागिरी) यांची निवड करण्यात आली. तर दोन उपाध्यक्ष निवड होऊन मोहन घडशी (लांजा) व युयुत्सु आर्ते (देवरूख) यांची निवड झाली. त्याचप्रमाणे सरचिटणीसपदी रविंद्र मटकर (राजापूर), चिटणीस संतोष कुळे (चिपळूण), खजिनदार सुधाकर मास्कर (गुहागर) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
या संघटनेच्या सदस्यापदी विजय मांडवकर, परशुराम मासये, अशोक डोंगरकर (राजापूर), चंद्रकांत पालकर, गजानन तटकरी (लांजा), प्रदीप भालेकर, नितीन बंडागळे, कृष्णा जोगळे (संगमेश्वर), विश्वनाथ गावडे, विलास भातडे, सुरेश दसम (रत्नागिरी), जगन्नाथ शिंदे, प्रमोद घुमे (गुहागर), सुनील बळकटे, भिकाजी भुवड (चिपळूण), झयाजी विर, शाहीद खेरटकर (मुंबई) यांची निवड करण्यात आली आहे. उर्वरित राहिलेल्या दापोली, खेड, मंडणगड या तालुक्यांनाही समाविष्ट केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. या महत्वपूर्ण बैठकीला श्रीधर खापरे, शिवाजी मासये, सुरेश होरंबे, रविंद्र मठकर, प्रभाकर उर्फ पी.टी.कांबळे, टक्के, भिकाजी भुवड, सुधाकर मास्कर, विलास भातडे, दिलीप तांडकर, नितीन बंडागळे, युयुत्सु आर्ते, शाहीद खेरडकर, झयाजी वीर, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या बैठकीचे प्रास्ताविक अरूण कळंबटे, तर सूत्रसंचालन विश्वनाथ गावडे यांनी केले.