धामणे येथील मजूर महिलांची ग्रा . पं.कडे मागणी
वार्ताहर /धामणे
धामणे ग्राम पंचायतीच्यावतीने नरेगा योजनेंतर्गत सुरू असलेले काम ग्राम पंचायतीने बंद ठेवल्याने रोजगाराला जाणाऱया महिला कामगारांनी ग्राम पंचायत अध्यक्षांकडे नरेगा योजनेतील बंद ठेवलेली कामे तातडीने सुरू करा, अशी जोरदार मागणी सोमवार दि. 14 रोजी केली.
शासनाकडून वर्षातून 100 दिवस रोजगारांना काम देण्याचे आदेश काढूनदेखील यंदा आतापर्यंत 10 ते 12 दिवस मजुराला काम देण्यात आले आहे. त्यानंतर पीडीओच्या नाकर्तेपणामुळे आता सुरू असलेले काम बंद असल्याचे कळते. सुरू असलेल्या कामाची पाहणी करून केलेल्या कामाच्या मोजमापसाठी शासनाने अभियंते नेमले आहेत. त्यांनी 10 ते 12 दिवसाच्या कामाचा तपशील वरि÷ अधिकाऱयांना दिला नाही. त्यामुळे हे काम बंद असल्याचे कळते आणि पीडीओ वेळेवर कामावर येत नाहीत. शिवाय कामाबद्दल विचारल्यानंतर ‘कन्नडमध्ये बोला, मला मराठी कळत नाही’ अशी उर्मट उत्तरे देतात, असे ग्रा. पं. मध्ये पीडीओंना भेटण्यासाठी आलेल्या महिलांनी सांगितले. पीडीओ उपस्थित नसल्याने त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला असता अभियंते रजेवर असल्याचे त्यांनी सांगितले. पीडीओ आणि अभियंत्याच्या नाकर्तेपणामुळे नरेगाची कामे बंद असल्याने धामणे, कुरबरहट्टी, मासगौंडहट्टी, देवगणहट्टी येथील 450 ते 500 मजूर बेरोजगार झाले आहेत. शासनाच्या नियमानुसार वर्षातून 100 दिवस रोजगारांना काम मिळणार का? असा प्रश्न येथे उपस्थित महिलांकडून विचारला जात आहे. याप्रसंगी रेखा मेलगे, रंजना सुंधळकर, विजया तुक्काण्णाचे, सविता मेलीमनी, जयश्री जायाण्णाचे, उज्ज्वल बाळेकुंद्री, लक्ष्मी चतुर, रेणुका रेमाण्णाचे, रेखा चौगुले आदी महिला उपस्थित होत्या.