वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन साध्या पद्धतीने दसरा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दसऱयात काय असावे, काय नसावे याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे.
कर्नाटकात कोरोना महामारीचा फैलाव वाढतच आहे. बुधवारी रात्रीपर्यंतच्या अहवालावरून कर्नाटकातील एकूण रुग्णसंख्येने सव्वा चार लाखांचा आकडा पार केला आहे. आतापर्यंत 6,808 जण दगावले आहेत. रोज 9 ते 10 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे यंदाचा म्हैसूर दसरा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सर्व नियम पाळत थाटात दसरा साजरा करण्यासाठी सरकारने परवानगी द्यावी. त्यामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, अशी मागणी वाढली होती. मात्र वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन साध्या पद्धतीने दसरा साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यंदा जंबो सवारीही केवळ राजवाडय़ापुरतीच मर्यादित असणार आहे. दसऱयात काय असावे, काय नसावे याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे.
गेल्या वषी थाटात दसरा साजरा करण्यात आला होता. त्यासाठी 16 कोटी 50 लाख रु. खर्च करण्यात आले होते. यंदा साध्या पद्धतीने दसरा साजरा करण्याचा निर्णय घेणाऱया सरकारने त्यासाठी 15 कोटी रु. राखीव ठेवले आहेत. साध्या पद्धतीने साजरा करणार तर त्यासाठी 15 कोटी कशासाठी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अद्याप यासंबंधीचा निर्णय व्हायचा असला तरी यंदा थाटामाटाला फाटा देण्यात येणार आहे हे स्पष्ट आहे. दुसरीकडे अमली पदार्थ प्रकरणाची चौकशी जोर धरू लागली आहे. वरि÷ पोलीस अधिकारी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली चौकशी करण्यात येत आहे. चित्रपट अभिनेत्री रागिणी पाठोपाठ संजनालाही अटक झाली आहे. सॅन्डलवूड भोवतीच तपासाची चपे फिरत आहेत. त्यामुळे केजीएफ फेम यश (रॉकी) सह अनेक अभिनेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन केवळ सॅन्डलवूडलाच का लक्ष्य बनविण्यात आले आहे असा सवाल उपस्थित केला.
म्हैसूर दसऱयाला ऐतिहासिक परंपरा आहे. दसऱयाला पर्यटन व्यवस्थाही जोमात असते. कारण देशविदेशातून पर्यटक दसरा बघण्यासाठी येतात. दसरा झाला की कर्नाटकातील वेगवेगळय़ा पर्यटनस्थळांना भेटी देतात. त्यामुळे साहजिकच अर्थव्यवस्थेला चालना मिळते. दुष्काळामुळे यापूर्वी अनेकवेळा दसरा साध्या पद्धतीने झाल्याची उदाहरणे आहेत. हत्तीवरून चामुंडेश्वरी देवीची मूर्ती मिरवणूक मर्यादित स्वरुपात होणार आहे. कोरोना महामारीच्या संकटातून वाचविण्यासाठी यंदा चामुंडेश्वरी देवीला साकडे घालण्यात येणार आहेत.
कोरोना महामारीमुळे चित्रपटक्षेत्रालाही फटका बसला आहे. अनेक चित्रपट अर्धवट राहिले आहेत. थिएटर अद्याप बंद आहेत. 1 ऑक्टोबरपासून थिएटर सुरू करण्यासंबंधी परवानगी देण्याची मागणी मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्याकडे करण्यात आली आहे. याचवेळी ड्रग माफियात सॅन्डलवूड संबंधी जी चर्चा सुरू आहे त्या चर्चेवर निर्बंध लावण्याची मागणीही करण्यात आली आहे. कारण चित्रपटक्षेत्रात सगळेच नशेबाज नाहीत. एका दोघा जणांनी नशा केली म्हणून संपूर्ण सॅन्डलवूडला दोषी ठरविणे कितपत योग्य आहे, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. कोरोना महामारीमुळे अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. यामध्ये चित्रपट उद्योगही एक आहे. दैनंदिन मालिकांच्या चित्रीकरणाला अनुमती मिळाली आहे. आता थिएटर उघडण्यासाठी परवानगी मागण्यात आली आहे. अनलॉक-5 मध्ये परवानगी मिळेल अशी सॅन्डलवूडला आशा आहे.
सॅन्डलवूडमधील तारकांची नावे ड्रग माफियासंबंधी ठळक चर्चेत आल्यानंतर त्यांना धक्का बसला आहे. ही गोष्ट खरी असली तरी पेज-3 च्या धर्तीवर रंगणाऱया रात्रीच्या पाटर्य़ांमध्ये अमली पदार्थांचा सर्रास वापर होतो. एकदा नशा चढली की वेश्या व्यवसायालाही येथूनच चालना मिळते. अशी अनेक उदाहरणे कर्नाटकात पहायला मिळतात. रागिणी आणि संजनाच्या अटकेनंतर त्यांनी अनेकांची नावे उघड केली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी दबाव तंत्राचाही वापर सुरू आहे. कारण या दोघींनी तोंड उघडले तर प्रभावी नेते, त्यांची मुले, सरकारी अधिकारी यांच्या अडचणी वाढणार आहेत.
व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असणारा विरेन खन्ना हा सॅन्डलवूडमधील ड्रग माफियाचा म्होरक्मया समजला जातो. सीसीबीने त्याला अटक केली आहे. विरेन हा मूळचा दिल्लीचा. बेंगळूरात त्याने चांगलाच जम बसविला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये किंवा बेंगळूरजवळच्या प्रभावी नेते, अभिनेत्यांच्या फार्महाऊसमध्ये रंगीत पाटर्य़ा चालायच्या. या पाटर्य़ांमधून अमली पदार्थांचा सर्रास वापर व्हायचा. सीसीबीच्या चौकशीतून आता हे सर्व कारनामे उघड होत आहेत.
21 ते 30 सप्टेंबरपर्यंत विधिमंडळाचे अधिवेशन होणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर सुरक्षिततेची काळजी घेत हे अधिवेशन भरवावे लागणार आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी तीन दिवस अधिवेशनात भाग घेणाऱयांची कोरोना तपासणी करण्यात येणार आहे. आमदार, मंत्री, अधिकारी, पत्रकार या साऱयांचीच तपासणी होणार आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह त्यांना अधिवेशनात भाग घेता येणार आहे. अधिवेशनात सामाजिक अंतर राखण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. प्रेक्षकांच्या गॅलरीत पत्रकारांची व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे. पत्रकार गॅलरीत केवळ 15 जणांना बसण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे.
अमली पदार्थ प्रकरण, राजधानीतील दंगल, कोरोना हाताळण्यातील अपयश आदी विषयांवर सरकारला घेरण्यासाठी विरोधी पक्षांनी तयारी केली असली तरी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर यंदाच्या अधिवेशनात सभाध्यक्षांच्या आसनासमोर धरणे धरता येईल की नाही अशी परिस्थिती आहे. अधिवेशनात धरणे धरणे हे आमदारांचा हक्क आहेच. मात्र कोरोना महामारीमुळे यासंबंधीही विरोधी पक्षांनी परिस्थितीची जाणीव करून घ्यावी, असे विधानसभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या छायेखाली होणाऱया या अधिवेशनात नेमके काय होणार याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले
आहे.