प्रतिनिधी / बेळगाव
शहर आणि उपनगरांमधील भटक्मया जनावरांचा बंदोबस्त करण्याची कारवाई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. मात्र भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. रात्री अपरात्री नागरिकांवर हल्ले करण्याबरोबरच भुंकून नागरिकांना हैराण करणाऱया भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी महापालिकेकडून नसबंदी उपक्रम राबविण्यात येतो. मात्र मागील वर्षभरापासून ही कारवाई थांबविण्यात आली आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरांमध्ये भटक्मया कुत्र्यांच्या संख्येत वाढ होत आहे. केवळ वाढ होत नसून कुत्र्यांचा उपद्रव देखील वाढला आहे. काही ठिकाणी भटक्मया कुत्र्यांना हॉटेल, खानावळीतील खाद्यपदार्थ मिळतात मात्र काही गल्ल्यांमध्ये नागरिक भटक्मया कुत्र्यांना खाद्य पदार्थ देऊन त्यांचे पालनपोषण करीत आहेत. मात्र या कुत्र्यांच्या भुंकण्यामुळे तसेच अंगावर धावून जाण्यामुळे गल्लीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
कंग्राळगल्ली सारख्या परिसरात भटक्मया कुत्र्यांची संख्या वाढली असून या परिसरात फिरणाऱया कुत्र्यांचा त्रास रहिवाशांना होत आहे. रात्रीच्यावेळी रस्त्यावर थांबून भुंकणाऱया कुत्र्यामुळे नागरिकांना पुरेशी झोप मिळणे मुश्किल बनले आहे. सध्या उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक टेरेस अथवा घराच्या कट्टय़ावर झोपत असतात. मात्र कुत्र्याच्या भुंकण्यामुळे झोप मोड होत असल्याच्या तक्रारी नागरिक करीत आहेत.
काही ठिकाणी रात्रपाळी करून ये-जा करणाऱया नागरिकांवर देखील भटकी कुत्री हल्ला करीत आहेत. दिवसभर गायब असलेली कुत्री रात्रीच्यावेळी रस्त्यावर फिरताना दिसतात. हॉटेल आणि खानावळीच्या परिसरात फेकण्यात आलेले अन्न व खाद्यपदार्थ खाऊन रस्त्यावरून ये-जा करणाऱया नागरिकांवर हल्ला करीत आहेत. दुचाकी असो किंवा सायकल तसेच चालत जाणाऱया नागरिकांवरही हल्ला करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे भटक्मया कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून भटक्मया कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मगणी होत आहे.