- ‘मी प्रबोधनकार वाचले तसे यशवंतराव चव्हाणही वाचले आहेत’; राज ठाकरेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर
ऑनलाईन टीम / पुणे :
मी प्रबोधनकार ठाकरेही वाचले आणि यशवंतराव चव्हाण पण वाचले, आहेत. मी जे बोललो त्याचा माझ्या आजोबांच्या पुस्तकांशी काय संबंध होता हे मला पवार साहेबांनी समजावून सांगावे. आपल्याला पाहिजे तेवढे प्रबोधनकार ठाकरेंचे विचार घ्यायचे बाकी नाही, हे चूकीचे आहे. असे प्रत्युत्तर राज ठाकरे यांनी शरद पवारांना दिले आहे.
पुढे ते म्हणाले, जात ही गोष्ट केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात हजारों वर्षांपासून आहे. 99 सालापर्यंत महाराष्ट्रात जातपात होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जातीद्वेष वाढला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा जातीपातीचा विचार बाहेर येणे गरजेचे आहे, एवढाच माझ्या वक्तव्यामागचा अर्थ होता.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसीय पुणे दौऱयावर आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या जातीचे वातावरण तयार केले जात आहे. आरक्षण मिळणार नसेल तर त्यांना स्पष्टपणे सांगा, माथी भडकवून मतांचे राजकारण का करता? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. मागील 74 वर्षांपासून तेच तेच राजकारण होत आहे, त्याच चिखलात आपण अडकले आहोत. आपण काही गोष्टींपासून बाहेर पडण्याची गरज आहे. निवडणूकीसाठी जातीचे राजकारण करणे वाइटं असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
- ‘बाबासाहेबांना ब्राह्मण किंवा पवारांना मराठा म्हणून भेटत नाही’
बाबासाहेब पुरंदरेंना मी इतिहास संशोधक म्हणून जातो, ब्राह्मण म्हणून नाही. पवारसाहेबांकडे मी मराठा म्हणून जात नाही. कुणाच्याही घरी आपण जात म्हणून जातो का? वॉर्डनिहाय आरक्षणापेक्षा स्त्री पुरुष हेच आरक्षण असलं पाहिजे. विरोध काय करणार, वरती जे ठरवात तेच करावे लागते. अजून तुमचं नशीब तुमच्या क्षेत्रात मीडियात अजून आरक्षण नाही. मी काय वाचतो आणि काय वाचले आहे, हे मला माहिती आहे. माझ्या पक्षाला माहितीय, मला मोजायचा प्रयत्न करु नये, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.