बेळगाव / प्रतिनिधी
तालुक्मयातील काही भागात यंदाच्या खरीप हंगामात लागवड करण्यात आलेले बटाटा बियाणे उगविण्याआधीच कुजले होते. त्यामुळे बटाटा उत्पादक शेतकऱयांना मोठा फटका बसला होता. दरम्यान कृषी अधिकाऱयांनी खराब झालेल्या शेतशिवाराची पाहणी केली होती. मात्र अद्यापही नुकसाग्रस्त शेतकऱयांना भरपाई मिळाली नाही. तालुक्मयातील बस्तवाड (हलगा), बेकिनकरे, बसुर्ते, अतिवाड, हलगा, कोंडूसकोप, खमकारहट्टी, कोळीकोप्प आदी भागातील बटाटा उत्पादक शेतकऱयांचे बटाटा बियाणे उगविण्याआधीच जमिनीतच कुजले होते. त्यामुळे मोठा फटका बसला. दरम्यान नुकसानग्रस्त बटाटा उत्पादकांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत होती. मात्र अद्याप त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
यंदा मान्सूनने चांगली साथ दिल्याने बटाटा लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, तालुक्मयात मोठय़ा प्रमाणात पावसाळी बटाटय़ाची लागवड करण्यात आली. मात्र बटाटा बियाणे उगविण्याआधीच जमिनीत खराब झाल्याने काही शेतकऱयांना मोठा फटका बसला आहे.
शेतकऱयांनी बटाटा बियाणे विकत घेण्याबरोबर मशागत, रासायनिक खत, मजूर आदींसाठी मोठय़ा प्रमाणात खर्च आला आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरी अडचणीत आले आहेत. त्यातच कोरोनाच्या माहामारीमुळे शेतकरी संकटात असताना नुकसानग्रस्त शेतकऱयांच्या भरपाईकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱयांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे..