प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यभरात चाललेल्या एसटीच्या संपात सहभागी रत्नागिरी विभागातील 249 कर्मचाऱयांना सेवा समाप्तीची नोटीस बजावण्यात आली होत़ी 24 तासात कामावर हजर होण्याचा इशारा या नोटीसमध्ये देण्यात आला होत़ा या नोटीसला उत्तर न देणाऱया कर्मचाऱयांवर बडतर्फीची कारवाई करण्याचे संकेत एसटी प्रशासनाकडून देण्यात आले आहेत़
सलग 12 व्या दिवस चाललेल्या एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आह़े यामुळे प्रशासनाकडून कारवाईचे पाऊल उचलले जात आह़े आतापर्यंत संपात सहभागी 87 कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले आह़े सध्या 137 कर्मचारी कामावर हजर राहिले आहेत़ जिल्हय़ामध्ये केवळ राजापूर आगारातून 3 बस सोडण्यात आल्या होत्य़ा चालक व वाहक कामावर हजर होत नसल्याने एसटी सेवा सुरू करण्यासमोर प्रश्न आह़े
एसटी कर्मचाऱयांच्या संपामुळे प्रवासासाठी खासगी वाहतुकीचा आधार घेतला जात आह़े जिह्यामध्ये एसटीच्या 4 हजार 500 फेऱयांना या संपाचा फटका बसला असून दिवसाला सुमारे 70 लाख रूपयांचे नुकसान होत आह़े कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने संप मिटण्याची शक्यता धुसर झाली आह़े एसटीच्या विलिनीकरणाचा विषय सध्या न्यायप्रविष्ठ असून 22 तारखेला पुढील सुनावणी होणार आह़े यामुळे सर्व एसटी कर्मचाऱयांचे लक्ष या 22 तारखेकडे लागले आह़े तोपर्यंत एसटीचा संप मिटण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आह़े