वार्ताहर / औंध
वरुड ता खटाव येथे प्रशासनाच्या सावळ्या-गोंधळ कारभारामुळे पंचनामे करण्यास उशीर झाला असून आता शिवारात पिके दिसत नसली तरी रानातून पाणी वाहत आहे तर काही ठिकाणी गुडघाभर चिखल आहे,असे असूनही पंचनामे होत नसल्याने शेतकयांनी पंचनामे होईपर्यंत पिके पाण्यात ठेवूद्या का असा सवाल वरूडचे सरपंच प्रतिनिधी लालासाहेब माने यांनी केला आहे.
औंध येथे पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. लालासाहेब माने म्हणाले की,वरूडमध्ये पावसाने शेतकयांचे अतोनात नुकसान झाले आहे,प्रशासनाने ग्रामसेवकांना पंचनामे करण्याचे आदेश दिले होते, अशातच वरुडला असणाया ग्रामसेविका रीतसर रजेवर असूनही त्यांची ऑर्डर काढण्यात आली,त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर चार दिवसांनी दुस्रया ग्रामसेवकांची नेमणूक करण्यात आली या सर्व गोष्टीत आठ दिवस गेले,तोपर्यंत काही पिके कुजून वाहून गेली तर काही पिके उभ्या पाण्यात आहेत,तर पुढील पिकांसाठी रान तयार करण्यासाठी काहींनी उपटून बांधावर टाकली,त्यामुळे आता पंचनामे करताना अनेक नियम लावले जात आहेत.त्यामुळे आता शेतकयांनी पंचनामे करण्याची वाट बघत जैसे थे थांबले पाहिजे होते का काय असा प्रश्न ग्रामस्थ करू लागले आहेत.
या सर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने वरुड गावचा शेतीच्या नुकसानीचा सरसकट पंचनामा करावा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागणार असल्याची माहिती माने यांनी दिली.