प्रतिनिधी / कोल्हापूर
अतिवृष्टीने सलग दुस्रया वर्षी शेतकयांचे हातचे पीक वाया गेले आहे. विमा कंपन्या भरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत. शासनाची मदत पोहोचत नाही. खराब झालेले पीक काढण्यासाठीदेखील येणारा खर्च पेलवणारा नाही. अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडलेला आहे. शासनाने पंचनाम्यांच्या औपचारिकतेमध्ये न जाता सरसकट मदत जाहीर करावी व विमा कंपन्यांना कडक निर्देश देऊन शेतकयांना त्यांच्या पिकविम्याची भरपाई तात्काळ मिळेल, याची तजवीज करावी, अशी मागणी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बुधवारी येथे केली.
खासदार संभाजीराजे यांनी मराठवाडा अतिवृष्टी नुकसान पाहणी दौरा सुरु केला आहे. बुधवारी उस्मानाबाद जिह्यातील दाऊतपूर, इरला, रामवाडी, काजळा या गावांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी भागातील शेतकयांनी त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. विमा कंपन्या कारणे देऊन पीकवीमा नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे अनेक शेतकयांनी यावेळी खा. संभाजीराजे यांना सांगितले. तसेच शासनाने अद्याप कोणतीही मदत जाहीर न केल्याचीही खंत व्यक्त केली.यावर खा. संभाजीराजे म्हणा ले, नुकसानग्रस्त शेतकयांना वेळेत मदत व भरपाई मिळून त्यांचे जीवनमान पूर्वपदावर यावे, यासाठी सर्व स्तरांवर पाठपुरावा करण्यासाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
इरला गावातील कांबळे कुटूंबियांची संभाजीराजेंनी घेऊन दिला धीर
दहा दिवसांपूर्वी अतिवृष्टी हेऊन आलेल्या महापूरामध्ये इरला गावातील बालाजी वसंत कांबळे हे वाहून गेले व अद्यापही ते बेपत्ता आहेत. त्यांच्या कुटूंबियांची संभाजीराजे यांनी भेट देऊन त्यांना धीर दिला. घरातील कर्त्या मुलावर अशी परिस्थिती ओढवल्याने वृद्ध आई वडील खचून गेले आहेत. घरची परिस्थितीही अत्यंत हलाखीची आहे. याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याशी संभाजीराजेंनी फोनवरून संपर्क साधून या कुटूंबास धीर देण्यासाठी तात्काळ मदतीची तरतूद करावी, अशी सूचना केली. तसेच, दुर्दैवाने याबाबत काही अनुचित बातमी आल्यास अपवादात्मक परिस्थीती असल्याने तसा अहवाल करून तात्काळ या कुटूंबास आर्थिक मदत देण्याची ग्वाही यावेळी जिल्हाधिका-यांनी संभाजीराजेंना दिली.