आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
परतीच्या पावसामुळे शेतशिवारातील पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ऐन सुगी हंगामाला सुरुवात होतानाच पावसाने धुमाकूळ घातला असल्याने हातातोंडाला आलेली पिके उद्ध्वस्त झाली आहेत. यामुळे तालुक्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.
गेल्या आठ दिवसांपासून तालुक्यात परतीचा पाऊस होऊ लागला आहे. या पावसामुळे कापणीसाठी आलेले भात पीक मात्र पूर्णतः आडवे झाले आहे. तसेच शिवारातील सोयाबीन, भुईमूग आदी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. याशिवाय बटाटा, रताळी काढणी खोळंबली असल्याने शेतकऱयांना चिंता लागून राहिली आहे.
सुरू असलेल्या परतीच्या पावसाने रविवारी थोडय़ा प्रमाणात विश्रांती दिली होती. यामुळे शेतात असलेल्या भुईमूग व सोयाबीनची काढणीकरिता शेतकरी गेले असता पावसामुळे सोयाबीन व भुईमूग कुजून सारी पिकेच उद्ध्वस्त झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यामुण्s अनेक शेतकऱयांच्या डोळय़ातून पाणी आले होते.
कधी दुष्काळ, अतिवृष्टी तर कधी बाजारभाव अशा दुष्टचक्रात बळीराजा सापडलेला असतो. शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळणार असे प्रशासनामार्फत जाहीर करण्यात येते. मात्र, बहुतांशी शेतकरी हे नुकसानभरपाईपासून वंचितच राहतात.
गतवर्षी महापुरामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. प्रशासनामार्फत सर्व शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळवून देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, बऱयाच शेतकऱयांना नुकसानभरपाई मिळाली नाही. यंदा सुरुवातीला पावसाने बऱयापैकी साथ दिली. मात्र, मध्यंतरीच्या काळात अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर उर्वरित पिकांवर शेतकऱयांची आस लागून राहिली होती. सुगी हंगामाला सुरुवात कण्याच्या वेळेतच परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱयांची चिंता वाढली.
काही भागात माळरानावरील भात कापणीला सुरुवात करण्यात आली होती. मात्र, परतीच्या पावसाने या कामाला ब्रेक लागला आहे. पोसवून आलेल्या भात पिकाची येत्या आठ दिवसात कापणी करण्यात येणार होती. पावसाने पोसवलेली लोंबे खराब झाली असल्याने भाताच्या उताऱयात घट होणार आहे.
दसऱयाच्या सणाला रताळी व बटाटय़ाची मागणी बऱयापैकी असते. यामुळे पश्चिमभागात बटाटे व रताळी काढणी जोमाने सुरू होती. पण पाऊस सुरू झाल्यामुळे ही कामे खोळंबली आहेत. त्यामुळे दसऱयाचा हंगाम वाया गेल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. रविवारी पावसाने थोडी विश्रांती घेतली असल्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. पण सुगी हंगाम साधण्यासाठी पावसाने पूर्णतः उघडीप देण्याची गरज आहे.