भंते तिस्सावोरो यांची माहिती
बेळगाव : गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या बुद्धगयाची स्थिती पर्यटकांअभावी गंभीर झाली आहे. दरवषी 70 कोटींहून अधिक हिंदू बांधव भारताबरोबरच 32 बौद्ध देशांतून येतात.
ताजमहलपेक्षाही बुद्धगयाला येणाऱया पर्यटकांची संख्या अधिक आहे. लॉकडाऊनमुळे येथील व्यापार, उद्योग थंडावला आहे. तसेच बुद्ध विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱया भंतेजींवर वाईट प्रसंग येत आहेत. त्यामुळे सरकारने भंतेजींकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी बुद्ध अवशेष बचाव जनजागृती समितीचे भंते तिस्सावोरो यांनी केली आहे.
देशभर बुद्ध विचारांचा प्रचार करणारे भंते तिस्सावोरो सध्या बेळगावला आले आहेत. त्यावेळी त्यांनी तरुण भारतला भेट देऊन बुद्धगयाच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. बुद्धगया हे केवळ धार्मिक स्थळ नसून पर्यटन स्थळ बनले आहे. त्यामुळेच तेथील अर्थव्यवस्था श्रद्धाळू व पर्यटकांवर अवलंबलेली आहे. हा व्यवसाय केवळ 6 महिनेच त्या ठिकाणी असतो. परंतु यावषी कोरोनामुळे पर्यटकच आलेले नाहीत. त्यामुळे तेथील अर्थकारण पूर्णपणे कोलमडल्याचे सांगितले.
बुद्धगया येथे बौद्ध विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱया भंतेंची संख्या मोठी आहे. परंतु भाविकांची संख्या घटल्यामुळे भंते अडचणीत आले आहेत. भाविक व पर्यटकांशिवाय तेथे इतर पर्याय उपलब्ध नाहीत. वास्तविक बिहार सरकारने भंतेजींच्या जेवण व औषधोपचारांची व्यवस्था करायला हवी होती. परंतु तसे न झाल्यामुळे केंद्र सरकारने भंतेजींची व्यवस्था करण्याची मागणी तिस्सावोरो यांनी केली आहे. तसेच ज्यांना याविषयी अधिक माहिती हवी त्यांनी भंते तिस्सावोरो (9067138588) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.