प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलीटरी डेअरी फार्मच्या समोरील बाजूस मोठय़ा प्रमाणात खुली जागा आणि विविध झाडे आहेत. यामुळे शहराचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे. सदर जागा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत येते. मात्र, सदर जागेवर इमारतीचे साहित्य टाकण्यात येत आहे. सरकारी कार्यालये आणि रुग्णालयांमधील इमारतींचे टाकाऊ साहित्य टाकण्यात आले आहे.
शहराचा पसारा वाढत असल्याने विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. स्मार्ट सिटी बनविण्यासाठी कोटीचा निधी खर्च करण्यात येत आहे. रस्त्याचा विकास आदींकरिता शहरातील झाडांची कत्तल करण्यात आली आहे. यामुळे पर्यावरण नष्ट होत चालले आहे. अशातच आता पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणाऱया परिसराची दुरवस्था झाली आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोड आणि दुसऱया बाजूला क्लब रोडच्या मधील भागात मोठय़ा प्रमाणात झाडे आहेत. व्हॅक्सिन डेपो आणि या ठिकाणी असलेली झाडे पर्यावरणपूरक आहेत. पण मिलीटरी डेअरी फार्मसमोर असलेल्या जागेला डंपिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोडवरील रस्त्याशेजारी कचरा टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जुन्या इमारतींचे साहित्यही टाकण्यात येत आहे.
परिणामी ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. किराणा दुकानांतील कचरा, भाजी विपेते, मांस विपेते आणि फेरीवाले आदी व्यावसायिकांसह नागरिक घरातील कचरा या ठिकाणी टाकत आहेत. त्यामुळे हिरवागार दिसणारा परिसर कचऱयाचे आगार बनला आहे. काही झाडांची पडझड झाली आहे. प्लास्टिक पिशव्या, पत्रावळय़ा, प्लास्टिक ग्लास आणि घरातील जुने साहित्य पसरले आहे. यामुळे परिसराला खुपच बिकट अवस्था प्राप्त झाली आहे. कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. परिसर मिलीटरीच्या ताब्यात असल्याने परिसरामधून ये-जा करण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. पण अलीकडे या परिसरात जिकडे-तिकडे रस्ते झाले असल्याने वाहनधारक ये-जा करीत असतात. पण सायंकाळच्या वेळी परिसरात कोणीच नसते. याचा गैरफायदा घेऊन मद्यपान करणाऱयांसाठी हे ठिकाण सोयीचे बनले आहे.
मिलीटरी-कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष
सरकारी कार्यालयांतील इमारतींची किंवा खासगी घरांची दुरुस्ती करताना निर्माण होणारा कचरा आणि इमारतींचे टाकाऊ साहित्य या रस्त्याशेजारी टाकण्यात येत आहे. शहरात सरकारी इमारतांचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी असलेल्या जुन्या इमारती हटविण्यात आल्या. त्यामुळे इमारतींचे साहित्य गांधी चौकाशेजारी रस्त्यावर कचरा स्वरुपात टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. या परिसराकडे मिलीटरी प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पर्यावरणपूरक परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. परिसराची स्वच्छता करून चांगले उद्यान करून सुशोभिकरण करण्यात आल्यास नागरिकांना याचा उपयोग होऊ शकतो. पण याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले आहे.