नैर्त्रुत्य मोसमी वारे अर्थात मोसमी पाऊस केरळात दाखल झाल्याने आता खऱया अर्थाने पावसाच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मोसमी पावसाचा धडाका पाहता येत्या दोन ते तीन दिवसात तळकोकणात तो सक्रिय होण्याची चिन्हे दिसतात. हे पाहता देशाच्या विविध भागात वेळेत आगमन झाल्याने चालू वर्ष भरभराटीचे असेल, अशी आशा करायला हरकत नाही. गेले दीड वर्षे संपूर्ण देश कोरोनाशी लढतो आहे. आशा-निराशेचे ढग, मानसिक अस्वास्थ्य, आर्थिक ओढाताण याला बहुसंख्य नागरिकांना तोंड द्यावे लागते आहे. अशा या वातारणात मोसमी पावसाचे येणे केवळ आनंददायकच नव्हे तर नवी उमेद जागविणारे म्हणता येईल. दरवषी साधारण 1 जूनला केरळात मोसमी पाऊस दाखल होतो. वास्तविक 21 मे रोजी अंदमानात दाखल झाल्यानंतर 31 मे रोजी तो केरळात येणार असल्याचे हवामान विभागाने सुरुवातीला सांगितले होते. मात्र, बंगालच्या उपसागरातील ‘यास’ या चक्रीवादळामुळे त्याची गती मंदावली. अर्थात त्याला दोन दिवसांचा विलंब झाला असला, तरी गेले चार दिवस केरळात दमदार पाऊस होत होता, हे लक्षात घेतले पाहिजे. वाऱयाची दिशा ( पश्चिम नैर्त्रुत्य) वेग (ताशी 27 ते 27 किमी ) उंची (जमिनीपासून सुमारे 4500 मीटर) आणि ढगांचे प्रमाण हे त्याच्या आगमनाचे काही निकष होत. केरळमधील 14 हवामान केंद्रांपैकी 60 टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस 2.5 मिमी पावसाची नोंद झाल्यावर मोसमी सरी बरसल्याचे अधिकृतरीत्या हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आले. मागच्या सात वर्षांचा विचार केला, तर केरळात 29 मे ते 8 जून या कालावधीत मोसमी पाऊस डेरेदाखल झाल्याची आकडेवारी सांगते. केरळनंतरचा त्याचा टप्पा विशेष महत्त्वपूर्ण होय. कारण, तेथूनच त्याची खरी वाटचाल वा मार्गक्रमण सुरू होते. तळकोकणात 7 जून, पुणे-मुंबईसह महाराष्ट्र कर्नाटकाच्या काही भागात 10 जून, संपूर्ण महाराष्ट्र 15 जून, तर 15 जुलैपर्यंत अवघ्या भारतभर पोहोचणाऱया या वरूणराजाकडून विशेष अपेक्षा असतील. हवामान विभागाने पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात 98 टक्के पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, दुसऱया दीर्घकालीन अंदाजानुसार जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 101 टक्के पावसाची शक्मयता वर्तविण्यात आली आहे. यात मध्य भारतात सरासरीपेक्षा अधिक, वायव्य भारत, दक्षिण भारतात सरासरीइतका, तर ईशान्येकडच्या भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अदमास आहे. कृषीबहुल व ज्या भागात पाऊस जास्त होतो, त्या भागात म्हणजे खरीप पट्टय़ात यंदा सरासरीच्या 106 टक्के पाऊस होईल, असे भाकित आहे. ही सर्वात उत्साहवर्धक बाब होय. मागील वषी शेतीनेच भारताला तारले. कोरोनाच्या कठीण काळात जवळपास सर्व क्षेत्रातील कामगिरी खालावली असताना कृषी क्षेत्राने हात दिल्याने आपण तगू शकलो. या वषीही शेतीवर आपली मदार असेल. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात साधारणपणे 88 सेंमी पाऊस पडतो. तो सरासरीइतका पडणार नि दुष्काळाची शक्मयता केवळ 8 टक्के राहणार, हे गृहितक सर्वार्थाने सकारात्मक म्हणता येईल. खरे तर या वषी वळवाच्या वा पूर्वमोसमी पावसानेही चांगली सलामी दिली. त्यामुळे शेतकऱयांना लवकर पेरणीपूर्व कामे करण्यास मदत झाली आहे. जूनमधील सर्वसाधारण पावसाची शक्मयता ध्यानात घेता शेतीसाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे दिसून येते. ज्ये÷ कृषी हवामानतज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी महाराष्ट्रात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडेल, असे आपल्या अहवालात म्हटले आहे. तर हवामान विभागही खरीप पट्टय़ात 106 टक्के पाऊस होणार असल्याचे सांगतो. त्यामुळे कृषी अर्थव्यस्था हाच भारतीय अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देण्यात सहाय्यभूत ठरेल, अशी आशा करूयात. पावसाळा हा तसा अत्यन्त सुंदर ऋतू. याच काळात निसर्ग सौंदर्य ओसंडून वाहते. ते डोळय़ात साठविण्यासाठी वा वर्षा सहलीसाठी पर्यटकांची पावले दरवषी अशा पर्यटनस्थळांकडे वळतात. मागील वषी कोरोनामुळे या निसर्गानुभवापासून पर्यटकांना दूर रहावे लागले. कोरोनाचे मळभ कायम असल्याने यंदाही निर्बंध कायम आहेत. अर्थात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन त्यात शिथिलता आली, तरी वाहवत जाणे परवडणारे नाही. काळजी घ्यावीच लागेल. पावसाळा कितीही रमणीय असला, तरी याच काळात विविध साथजन्य आजार डोके वर काढत असतात. स्वाभाविकच कोरोनासोबतच डेंगी, मलेरिया वा तत्सम आजारांपासून सावध रहावे लागेल. त्यासाठी स्वच्छता, शुद्ध पाणी, चांगला आहार या गोष्टींबाबत प्रत्येकाने कटाक्ष पाळायला हवा. यंदा दमदार पावसाचा अंदाज असल्याने पुरासारख्या आपत्तींच्या दृष्टीनेही आधीच नियोजन केले पाहिजे. या काळात भिंत, घरे वा इमारती कोसळण्याचे अनेक प्रकार घडत असतात. म्हणूनच अशा घरात वा इमारतीत राहणाऱया नागरिकांचे वेळीच अन्यत्र पुनर्वसन हवे. जेणेकरून कोणतीही दुर्घटना घडणार नाही. मुंबईतील विक्रमी पाऊस व शहराचे जनजीवन कोलमडणे, हे समीकरणच बनले आहे. मात्र, त्याची तीव्रता कमी करून सर्व सुरळीत कसे राहील, यासाठी आतापासूनच उपाययोजना हव्यात. आजकाल 15 ते 20 मिमी पावसाने पुणे, नाशिकसारख्या अनेक महानगरांचे नियोजन ढासळते. त्याकरिता डेनेज व्यवस्थेसह सर्वच आघाडय़ांवर विशेष दक्षता घेणे क्रमप्राप्त ठरते. पावसाची तीव्रता, धरणे, त्यातील झपाटय़ाने वाढणारा पाणीसाठा, विसर्ग यावरही बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. जेणेकरून पूरस्थिती नियंत्रणात ठेवणे सोपे जाईल. पाऊस वा पाणी म्हणजे समृद्धीचे प्रतीक. पावसावरच सारी सजीवसृष्टी अवलंबून आहे. त्या अर्थी पाऊस म्हणजे माणसासाठी श्वासापेक्षा कमी नाही. या पावसाने शुभसंकेत देत सर्वांच्या आशा आज पल्लवित केल्या आहेत. नवे चैतन्य जागवत हा पाऊस बरसत रहावा नि काळवंडलेल्या वातावरणात एक नवी पालवी फुटावी, हीच सदिच्छा..!!
Previous Articleकोरोना संकटात अमेरिका भारतासोबत
Next Article जिया शंकर म्हणतेय… फॅशन माझे टॉनिक
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.