शांतता समितीच्या बैठकीत 11 दिवसांचा सूर
प्रतिनिधी/ बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी बेळगाव येथील बहुतेक पोलीस स्थानकात शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या. राज्य सरकारच्या नव्या नियमानुसार पाच दिवस गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले तर कार्यकर्त्यांनी 11 दिवसांचा सूर कायम ठेवला.
बुधवारी मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी व पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी यांच्या उपस्थितीत मार्केट पोलीस स्थानकात बैठक झाली. याबरोबरच खडेबाजार, शहापूर, टिळकवाडी, उद्यमबाग, एपीएमसी, माळमारुतीसह बहुतेक पोलीस स्थानकात बुधवारी सायंकाळी पोलीस अधिकाऱयांनी गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
राज्य सरकारने कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर पाच दिवसांच्या गणेशोत्सवाला परवानगी दिली आहे. त्यामुळे मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले. मात्र बेळगावच्या गणेशोत्सवाला एक वेगळी परंपरा आहे. येथील गणपती 10 दिवस पुजले जाता. अकराव्या दिवशी विसर्जन केले जाते. ही परंपरा खंडित होऊ नये, यासाठी सरकारने परवानगी देण्याची मागणी बहुतेक बैठकांत कार्यकर्त्यांनी केली.
मंगळवारी जिल्हाधिकाऱयांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत यासंबंधी राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचे ठरविण्यात आले होते. गुरुवारी सायंकाळपर्यंत राज्य सरकारकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळू शकते, असे चित्र आहे. कारण बहुतेक मंडळांनी 11 दिवसांचा आग्रह कायम धरला असून पाच दिवसांवर अडून बसलात तर विसर्जन तुम्हालाच करावे लागेल, असा इशारा दिल्यामुळे 11 दिवसांसाठी परवानगी मिळण्याची शक्मयता आहे.