प्रतिनिधी /पणजी
जल म्हणजेच पाणी हे मानवी तसेच प्राणीमात्रांच्या जीवनाचे स्त्राsत मानले जाते. पाणी हेच जीवन आहे व पाण्याशिवाय जगू शकत नाही हे माहिती असूनही मोठय़ा प्रमाणात पाण्याचा दुरूपयोग करून ते वाया घालविले जात आहे. पाण्याशिवाय या पृथ्वीतलावर आपण जीवसृष्टीची कल्पनाच करू शकत नाही. सजीवांच्या अस्तित्त्वासाठी अत्यंत आवश्यक असणारे जल हे आपणास निसर्गाकडून प्राप्त झालेली बहुमुल्य अशी देणगी आहे. पाण्याचे महत्त्व टिकवून ठेवण्याकरिता दरवर्षी 22 मार्च रोजी जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो.
1992 सालापासून सुरूवात
ब्राझीलमध्ये 1992 साली आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण आणि विकास संयुक्त राष्ट्रसंघाच्या परिषदेत जागतिक जल दिन साजरा करण्यात आला. त्यानंतर 1993साली संयुक्त राष्ट्रतर्फे आयोजित करण्यात आलेल्या साधारण सभेत जागतिक जल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यापासून 22 मार्च हा जागतिक जल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण मोजकेच
पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदी मोजकेच असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्यांच्या स्त्राsतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. गोव्याला संपन्न अशी जलसंपदा लाभलेली आहे. नदी, झरे, विहिरी अशा नैसर्गिक स्त्राsतांनी गोवा परिपूर्ण आहे. दुष्काळ झाला तरीही त्याचा परिणाम गोव्याला होत नाही. भौगोलिकदृष्टय़ा गोवा लहान असला तरीही गोव्याला नैसर्गिक नद्यांची संपत्ती लाभली आहे. राज्यात एकूण 11 नद्या असून 42 उपनद्या आहेत. मांडवी व झुआरी या दोन राज्याच्या प्रमुख नद्या आहेत. मांडवी तर गोव्याची जीवनदायिनी मानली जाते परंतु सध्या हीच नदी काही प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. याशिवाय तेरेखोल, गालजीबाग, शापोरा, बागा, साळ, तळपण अशा नऊ मोठय़ा नद्या गोव्यात आहेत.
नैसर्गिक स्त्रातांचे जतन आवश्यक
राज्यातील जास्ततः ग्रामीण भाग हा नद्यांवर अवलंबून आहे. या नद्यांच्या पाण्यावरूनच त्यांचे जीवनाचा गाडा चालतो. परंतु सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही नद्यांचे पाणी कमी होत चालले असल्याचे दिसून येते. याशिवाय नैसर्गिक स्त्राsत मानले जाणारे विहिरी, झरे पाहायला मिळतात परंतु घरात नळ आल्यामुळे काहीजणांनी या स्त्राsतांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. काही विहिरी तर ओस पडल्या आहेत. फक्त उन्हाळय़ात विहिरी, झऱयांवर आंघोळ करताना तसेच पाण्याचा वापर करताना दिसून येतो. नैसर्गिक स्त्राsत ही काळाची गरज आहे. या स्त्राsतांचे जतन होणे आवश्यक आहे.
गोव्यातही पाणी समस्या
गोवा सध्या विकासाच्या दृष्टीने प्रगती करत आहे परंतु पाण्याच्याबाबतीत इतर राज्याप्रमाणे गोव्यातही समस्या दिसून येतात. अजूनही ग्रामीण तसेच शहरी भागात पाण्याची टंचाई दिसून येते. अजूनही काही भागात टँकरची सोय करावी लागते. त्यामुळे पाणी समस्या ही गोव्यातही दिसून येते. काळानुसार अनैसर्गिक स्त्राsत उपलब्ध झाल्यामुळे तसेच पाण्याचा दुरूपयोग करून वाया घालविल्यामुळे ही समस्या मानवाने ओढवून घेतली आहे.
अजूनही पाण्याचा अनावश्यक वापर
पाणी हे जीवन आहे हे प्रत्येकजण म्हणतो आणि मानतो. परंतु हेच जीवन वाचविण्यासाठी किंवा पाण्याचा वापर आवश्यकतेप्रमाणे केला तर पाण्याची समस्या सुटु शकते. सध्या रंगपंचमी, गाडी धुण्यासाठी तसेच इतर गोष्टींसाठी पाण्याचा अनावश्यक पाण्याचा वापर केला जातो. याशिवाय ते पाणी वायाही घालविले जाते. त्यामुळे पाण्याचा योग्य वापर करणे आवश्यक आहे. ब्4गोव्यात अनेक ठिकाणी विकासामुळे झाडे कापली जात आहेत. त्यामुळे पाऊस जास्त प्रमाणात गोव्यात पडेल याची शक्यता कमी आहे. राज्याच्या काही भागात नैसर्गिक स्त्राsत असूनही पाण्याची समस्या आढळून येत आहेत. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचा वापर जपून करणे आवश्यक आहे.
जलसंवर्धनाविषयी काही गोष्टी
तहान लागल्यावर विहीर खणायची अशी स्थिती येण्यापूर्वी प्रत्येकाने पाण्याचा सावधगिरीने वापर करणे आवश्यक आहे. पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करावा. पाण्याचा स्त्राsत प्रदूषित करू नये. निसर्गाचे चक्र बदलत आहे. पावसाचे प्रमाण यावर्षी आहे तेवढे ते पुढील वर्षी होईलच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत आपल्याला पाण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी जपून वापरा हा संदेश प्रत्येकासाठी लागू आहे.