खडेबाजार येथील व्यापाऱयांचा इशारा
प्रतिनिधी / बेळगाव
खडेबाजार येथे चार ठिकाणी पाण्याची गळती सुरू आहे. मागील अनेक वर्षांपासून ही गळती सुरू असूनदेखील त्याकडे पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. पाण्याची गळती सुरू असल्याने दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असून ही गळती बुधवारपर्यंत न काढल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा खडेबाजार येथील व्यापाऱयांनी दिला आहे.
गणपत गल्ली कॉर्नरपासून ते शीतल हॉटेलपर्यंत खडेबाजार परिसरात अनेक ठिकाणी गळती लागली आहे. गळतीमुळे या ठिकाणचा रस्ताही खराब होत आहे. डबक्मयात साचलेले पाणी वाहनांमुळे उडून थेट दुकानांमध्ये जात आहे. यामुळे व्यापाऱयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यापूर्वीही अनेक वेळा या पाणी गळतीबद्दल पाणीपुरवठा मंडळाला माहिती देण्यात आली असून, त्यांच्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.
पाणीपुरवठा मंडळाचा अनागोंदी कारभार दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असतानाही पाणीपुरवठा मंडळाकडून याची दखल घेण्यात आलेली नाही. मागील अनेक वर्षांपासून ही पाण्याची गळती असूनही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. एकूण चार ठिकाणी पाण्याची गळती असल्याने ही गळती त्वरित काढण्याची मागणी व्यापाऱयांनी केली आहे.